वज्रेश्वरी, ता. ५ (बातमीदार) ः भिवंडी तालुक्यातून विरार- अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्प जात आहे. या प्रकल्पात भिवंडीतील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत; मात्र या प्रकल्पात बाधित शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याने शेतकरी नाराज आहेत. याच अनुषंगाने खासदार सुरेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन मागण्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.
या प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला अत्यल्प असून जमिनीच्या मोबदल्याबाबत नव्याने दरनिश्चित करण्याकरिता नवीन दरनिश्चित समितीची नेमणूक करावी. त्यामध्ये शेतकरी व त्यांचे प्रतिनिधी यांचा सहभाग घ्यावा. भिवंडी तालुक्यातील सर्व प्रकल्पबाधित जमिनीला सरसकट गुणांक दोन लागू करण्यात यावा. सर्व प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना अथवा शेतकऱ्यांना वारसांना प्रकल्पग्रस्त दाखले देऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्याच्या एक वर्षाच्या आत कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामील करून घेण्यात यावे. तसेच प्रकल्पाला होणाऱ्या वार्षिक नफ्यातून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना एक नफा हिस्सा निश्चित करून कायमस्वरूपी देण्यात यावा. भूसंपादन संमतीची जी मुदत २१ दिवसांची दिली आहे. तिचा कालावधी वाढवण्यात यावा, अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.