ग्रामीण भारतातील संरक्षण गुणांकांत वाढ
अॅक्सिस मॅक्स लाइफचे सर्वेक्षण
नवी दिल्ली, ता. ६ : ग्रामीण भारतातील संरक्षण गुणांक अर्थात आयपीक्यू १२ वरून १६ वर पोहोचला. अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स लिमिटेड पूर्वाश्रमीची मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने इंडिया प्रोटेक्शन कोशंटच्या (आयपीक्यू) सातव्या आवृत्तीत ग्रामीण भारतातील निष्कर्षांचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. त्यांनी भारतातील १५५ हून अधिक गावांमधील माहिती मिळवून हे सर्वेक्षण केले. यामध्ये ग्रामीण लोकसंख्येच्या आर्थिक सुरक्षिततेच्या प्रवासात त्यांच्या आकांक्षा, चिंता आणि बदलत्या संरक्षण गरजांचा आढावा घेण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.
अॅक्सिस मॅक्स लाइफचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रशांत त्रिपाठी म्हणाले, ‘आयपीक्यू ७.० ग्रामीण आवृत्ती एक बदल दर्शवते. त्यातून ग्रामीण भारतीयांमध्ये त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी जागरूकता आणि आकांक्षेत वाढ झाल्याचे दिसते. आपण एकत्रितपणे ‘आयआरडीएआय’च्या ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ या ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असताना, सुलभ उत्पादने, समावेशक सल्लागार नेटवर्क आणि तंत्रज्ञानावर आधारित वितरण मॉडेल्सद्वारे भारतीयांच्या सेवेची नव्याने कल्पना करण्याची गरज आहे. भारतातील जीवन विम्याचे भविष्य केवळ नावीन्यपूर्णतेनेच नव्हे तर ग्रामीण भारतातील विकसित होत असलेल्या गरजा आणि महत्त्वाकांक्षांना पाठिंबा आणि प्रतिसाद देण्याच्या आपल्या क्षमतेने साकारले जाईल.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.