बोर्डी, ता. १४ (बातमीदार) : डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील शेतकऱ्यांना २०२४ खरीप हंगामातील भरपाई देण्यासाठी तयार केलेल्या याद्या सदोष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई देण्यात विलंब होत आहे. याबाबत शेतकरी तहसील कार्यालय आणि तालुका कृषी कार्यालयात हेलपटे मारत आहे. शेतीची कामे टाकून आपला वेळ शेतकऱ्यांना वाया घालवावा लागत आहे.
मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाईसाठी एक वर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. किंबहुना वारंवार पाठपुरावा करूनही या विषयाकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांचा वाढता तगादा लक्षात घेऊन कृषी खात्याने नुकसान भरपाईच्या याद्या तयार करून तहसील कार्यालयाकडे सुपूर्द केल्या आहेत, परंतु तहसील कार्यालयाने या याद्यांमध्ये अनेक बाधितांची नावे वगळल्याने शेतकरी, बागायतदार संभ्रमावस्थेत आहेत. डहाणू, तरासरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची नावे तहसील कार्यालयाकडून आलेल्या यादी समाविष्ट नसल्याचे सांगितले जाते.
कृषी विभागाकडून तयार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या महसूल खात्याकडे पाठविल्या जातात. त्यांच्याकडून या याद्यामध्ये तफावत आढळून आल्यास तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना भरपाई लवकर देण्यासाठी कृषी विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
- अनिल नरगुलवार, तालुका कृषी अधिकारी
महसूल विभाग शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईविषयीच्या याद्या प्रसिद्ध करीत नाहीत. कृषी विभागाकडून या याद्या प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे महसूल विभागाचा संबंध नाही. शेतकऱ्यांनी याविषयी तालुका कृषी कार्यालयाकडे संपर्क साधून आपल्या शंका दूर करून घ्याव्या.
- सुनील कोळी, तहसीलदार, डहाणू तालुका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.