मुंबई

पावसाळी अनधिकृत मच्छीमारीवर बंदी घाला

CD

पालघर, ता. १६ (बातमीदार) : गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाळी मच्छीमारीला बंदी आहे; मात्र कोकणातील काही मच्छीमार बंदरांमध्ये अधिकृत मच्छीमारी चालू असल्याने मच्छीमारबांधवांकडून संताप व्यक्त केला आहे. अनधिकृत मच्छीमारीमुळे मुंबईसह देशात समुद्रमार्गाने घातपात झाल्यास केंद्रीय व राज्य गृहमंत्रालयाने राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे आणि त्यांच्या विभागाला जबाबदार धरून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती संघटना बेकायदा मासेमारीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून मंत्र्यांसोबत बैठका, निवेदने आदींच्या माध्यमातून अनेकवेळा चर्चा केली आहे; परंतु मंत्री, अधिकारी यांना लक्ष देण्यास वेळ नाही. रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी रायगड किनाऱ्यांवर संशयित बोया प्रकरणात एक हजाराहून अधिक बेकायदा बोटी असल्याने सागरी सुरक्षेला धोका असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे; मात्र मत्स्यव्यवसाय खाते कारवाई टाळत झोपेचे सोंग घेत आहे.

१९९५ मध्ये युती सरकारमधील तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती संघटनेचे अध्यक्ष, मच्छीमार नेते भाई बंदरकर यांना बोलावून समस्या विचारल्या होत्या; परंतु त्यांनी सर्व समस्या नंतर सांगू, आधी पावसाळी मासेमारी बंद करा, अशी मागणी केली होती. उरण तालुक्यात बेकायदा मासेमारी सुरू आहे, ती त्वरित बंद करा, असे सांगत त्यांनी गोरेगाव, मुंबई येथे मच्छीमारांना बोलावून कडक ताकीद दिली, तर अधिकारी वर्गाला निलंबित करण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून पावसाळी मासेमारी कोणीही करीत नव्हते; परंतु जून २०२३ पासून अर्थकारणातून सुरू झाली आणि बेकायदा मासेमारी सुरू झाली, असे संघटनेकडून सांगण्यात आले.

मच्छीमार संकटात येणार?
एलईडी, पर्ससीन व विध्वंसक बेकायदा मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार आधीच आर्थिक संकटात आहे. राज्यातील मच्छीमारीला कृषी दर्जा दिल्याबद्दल करंजा मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची भेट घेत पावसाळी बंदी कालावधीत बेकायदा मासेमारी सुरू होणार, अशी भीती व्यक्त केली होती. आता नेमके तेच घडत आहे. मत्स्यप्रजनन काळात एक हजाराहून बेकायदा मासेमारी नौका चालू आहेत. त्याचा मत्स्य संवर्धनावर परिणाम होऊन पारंपरिक मच्छीमारांना मत्स्य दुष्काळ परिस्थितीला सामोरे जावे लागेल, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मुंबईत राहून साधं मराठीही बोलता येईना' बिग बी अमिताभने केलं गुगल ट्रान्सलेशन, नेटकऱ्यानं चुक काढत केलं ट्रोल

Latest Marathi News Updates : आरक्षणात सर्वात मोठा वाटा आंतरवाली सराटीचा- मनोज जरांगे पाटील

धक्कादायक! 'चाफोडीत १४ वर्षीय शाळकरी मुलाने संपवले जीवन'; राहत्या घरी गळफास, आई, वडील शेतीत कामासाठी गेले अन्..

Palghar News: समुद्रकिनाऱ्यावर कंटेनर, ओमानमधून वाहून आल्याचा अंदाज

Chalisgaon News : चाळीसगावात १६ वर्षीय मुलाची सुटका; ‘सर्च वॉरंट’मुळे राज्यात पहिल्यांदाच नवीन कायद्याचा वापर

SCROLL FOR NEXT