मुंबई

भिवंडीत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

CD

भिवंडीत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : शहरात अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यातच आता आणखी दोन मुलींच्या अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीतील श्रृष्टी विकास कुमार श्रीवास्तव (१७) हिचे कोणीतरी अज्ञाताने फूस लावून अपहरण केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (ता. १४) श्रृष्टीचे आई-वडील कामावर गेले होते. भाऊ शाळेत गेलेला असताना श्रृष्टीचे कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून अपहरण केले आहे. दरम्यान, श्रृष्टीची आई कामावरून घरी परतल्यानंतर अपहरणाची बाब उघड झाली. वडील विकासकुमार त्रिपुरारीप्रसाद श्रीवास्तव यांच्या फिर्यादीवरून अज्ञातावर शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, तर दुसऱ्या घटनेत शहर पोलिस ठाणे हद्दीतील महेक आशिकआली बेगम (१६) ही सोमवारी (ता. १४) सकाळी १० वाजता तिच्या बहिणीला कामानिमित्ताने बाहेर जात असल्याचे सांगून गेली; मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. दरम्यान, कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध घेऊनही ती न सापडल्याने तिचे कोणीतरी अज्ञाताने फूस लावून अपहरण केल्याच्या संशयावरून तिची आई आसमा बेगम हिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: माझ्या मुलाची राख चोरीला गेली... गोकर्ण जंगलाच्या गुहेत सोपडलेल्या रशियन महिलेचा धक्कादायक आरोप!

Success Story: 'अंध प्रियांका बनली महसूल सहाय्यक'; परिस्थितीशी दोन हात करत यशाला गवसणी, शेणोलीतील युवतीची प्रेरक कहाणी

Nagpur News: जन्मठेपेच्या कैद्याने कारागृहात संपवलं जीवन

100 टक्के मतदार, 'ती' 14 गावं लवकरच महाराष्ट्रात घेणार; सीमाभागातील गावांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’तून शेतीसाठी पाणी; डाव्या-उजव्या कालव्यांतून विसर्ग, शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT