मुंबई

सहा महिन्यांत ३५६ हातगाड्यांवर कारवाई

CD

कल्याण-डोंबिवली हातगाडीमुक्त?
महापालिकेचा दावा; दोन लाखांची दंडवसुली
शर्मिला वाळुंज
डोंबिवली, ता. १६ : गेल्या सहा महिन्यांत महापालिका प्रशासनाने १० प्रभागांतील सुमारे ३५६ हातगाड्यांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख ५७ हजारांची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे; मात्र शहरात हातगाड्यांची संख्या निरंक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे या कारवाईबद्दल नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे, तर शहरात अजूनही खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. त्यामुळे त्या गाड्या अधिकृत आहेत का, असा सवाल नव्याने उपस्थित होत आहे.

उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्याने साथीच्या आजारांना निमंत्रण मिळते. असे असतानाही कल्याण-डोंबिवली परिसरात सर्रास हातगाड्यांवर खाद्यपदार्थविक्री होत आहे. एकीकडे शहरात साथीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली शहरात एकही हातगाडी नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. सध्या डेंगी, मलेरियासह सर्दी, खोकला, ताप, घसादुखी यांसारखे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. रस्त्याच्या कडेला साचलेल्या घाण पाण्यावर, बांधकामाच्या ठिकाणी, तसेच स्थानक परिसरात जिथे अशा हातगाड्या लागतात, तेथील कचरा, घाणपाणी यावर निर्माण होणाऱ्या डासांमुळे डेंगी, मलेरियाचे रुग्णदेखील वाढत आहेत.

पावसाळ्यात साथीचे, संसर्गजन्य आजार वाढू नयेत, यासाठी उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, बाहेरचे खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, अशी जनजागृती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येते. पथनाट्य, पत्रक वाटणे, झोपडपट्टी परिसरात सर्व्हे करणे अशा प्रकारे जनजागृती करण्यात येते; मात्र तरीदेखील साथरोग रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा नुकताच डेंगीने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे साथीचे रोग पसरतात, त्यांना अटकाव करण्यासाठी बाजार परवाना, आरोग्य विभाग प्रभाग स्तरावर पालिका हद्दीतील उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाडी, फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने परिसरातील बेकायदा हातगाड्या लावून उघड्यावर खाद्यपदार्थविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. गेल्या सहा महिन्यात पालिकेच्या १० प्रभागांत ३५६ हातगाड्यांवर कारवाई केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. या हातगाडी मालकांकडून एकूण दोन लाख ५७ हजार ८०० रुपयांची दंडात्मक वसुलीदेखील केली आहे. तसेच आता एकही हातगाडी शहरात नसल्याचा दावा यातून केला आहे.

क प्रभागात सर्वाधिक संख्या
पालिकेच्या क प्रभागात सर्वात जास्त म्हणजेच ९३ हातगाड्यांवर कारवाई केली आहे, तर ब आणि ग प्रभागात सर्वात कमी म्हणजेच अनुक्रमे १२ व १३ हातगाड्यांवर कारवाई केली आहे. कारवाईनंतर पालिका हद्दीत एकही हातगाडी नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मग दररोज ज्या हातगाड्या स्थानक व आजूबाजूच्या परिसरात लागत आहेत, त्या गाड्या कोणाच्या आशीर्वादाने चालत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


सहा महिन्यांतील कारवाई
प्रभाग कारवाई दंडवसुली
१/अ ६३ १५, ८००
२/ब १२ १५,४००
३/क ९३ ६७,४००
४/जे १६ २२,४००
५/ड २४ २८,८००
६/ फ ३० १९,१००
७/ ह ६१ २६,२५०
८/ग १३ १३,२००
९/आय १९ २२,८००
१०/ ई २५ २६,६५०
एकूण ३५६ २,५७,८००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

SCROLL FOR NEXT