वाढवण बंदर २४ जिल्ह्यांना जोडणार!
महाराष्ट्र मेरीटाइम समिटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः वाढवण बंदरामुळे राज्याच्या विकासात मोठी भर पडणार आहे. बंदर तयार झाल्यावर ते समृद्धी महामार्गाशी जोडून त्याद्वारे राज्यातील २४ जिल्ह्यांशी जोडले जाईल. तसेच मालवाहतुकीला गती देण्यासाठी वाढवण बंदरात एक ऑफशोअर विमानतळदेखील तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मत्स्योद्योग व बंदरे मंत्रालय आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या वतीने बुधवारी (ता. १६) महाराष्ट्र मेरीटाइम समिटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळीत ते बोलत होते.
समिटमध्ये सागरी व्यवसायातील तज्ज्ञांसह विविध मान्यवरांनी महाराष्ट्रात जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती उद्योग आणण्याचे फायदे, राज्याचे सागरी धोरण आणि जलमार्ग वापरून जल वाहतुकीचे भविष्य यावरही चर्चा केली. या वेळी मंत्री नितेश राणे यांनी राज्यातील बंदरे विकसित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच यामुळे निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांच्या पात्रतेसाठी आवश्यक कौशल्य यासंदर्भात आपला दृष्टिकोन आणि रोडमॅप मांडला. या परिषदेस विविध देशांचे राजदूत उपस्थित होते.
----
विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती
समिटमध्ये महाराष्ट्राच्या सागरी क्षमतांबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक परदेशी कंपन्या भारतात संधींच्या शोधात आहेत. या वेळी अदाणी पोर्टस, डेमन शिपयार्डस, हास्कोनिंग, थायसेनक्रुप मरीन सिस्टीम्स, जेएसडब्ल्यू इन्फ्रा, डीपी वर्ल्ड, रुरल एन्हान्सर्स ग्रुप, इंडिगो सीवेज आणि कॅंडेला अशा प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.