नेरळ-दामत ते आंबिवली गेटदरम्यान रस्त्याची दयनीय अवस्था
सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा
कर्जत, ता. १९ (बातमीदार) ः तालुक्यातील नेरळ-दामत ते आंबिवली गेटदरम्यान असलेल्या पेशवाई रस्त्याची भीषण दुरवस्था झाली आहे. शिवाय, त्यातून निर्माण होणाऱ्या नागरिकांच्या समस्या लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांच्या पुढाकाराने बुधवारी (ता. १६) नेरळ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या परिषदेत रस्त्याच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आणि रविवारी (ता. २०) साईबाबा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या १५ वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात त्याची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. रस्त्यावर मोठाले खड्डे, साचलेले पाणी, चिखल आणि अपुऱ्या गटार व्यवस्थेमुळे वाहनचालक, पादचारी, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका व व्यापाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. साईबाबा चौक ते दामत रेल्वे गेटदरम्यानच्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून योग्य दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांनी केली आहे. शेप यांनी पत्रकार परिषद घेऊन या समस्यांविरोधात प्रकाश टाकला आहे. रस्त्यावर सततच्या खड्ड्यांमुळे वाहनांचे वाढलेले अपघात, नेरळ पाडा गेट परिसरात दररोज ४०-४५ मिनिटे वाहतूक कोंडी, शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास होणारा विलंब, रुग्णवाहिकेला होणारा अडथळा, पावसाळ्यात चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे आरोग्याची भीती, त्यामुळे दैनंदिन व्यवहार करणाऱ्या नागरिकांचे होणारे हाल, असे विविध मुद्दे पत्रकार परिषदेत मांडण्यात आले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रस्त नागरिकांना न्याय मिळावा आणि रस्त्याची तातडीने डागडुजी व्हावी, यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी आंदोलनात सामील व्हावे, असे आवाहन शेप यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.