पालघर, ता. २० (बातमीदार) : राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना यामध्ये लाभार्थ्यांना जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांचे एकत्रित धान्य वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार पालघर जिल्ह्यासाठी दोन लाख ९९ हजार क्विंटल धान्याचे वाटप करण्यात येत आहे. सध्या हे धान्य स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार, अंत्योदय अन्न योजनाअंतर्गत लाभार्थ्यांना २५ किलो तांदूळ आणि १० किलो गहू, तर प्राधान्य कुटुंब योजनाअंतर्गत प्रति व्यक्ती तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू देण्यात येणार आहे. जिल्ह्यात ९८ हजार ३१७, अंत्योदय कुटुंबे आणि १४ लाख ५५ हजार ८८९, प्राधान्य कुटुंब गटातील शिधापत्रिकाधारक या योजनेंतर्गत लाभार्थी आहेत. एकत्रित धान्य वितरणामुळे अफरातफर होण्याची शक्यता लक्षात घेऊन कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जे लाभार्थी मिळालेले धान्य विकताना आढळतील, त्यांची शिधापत्रिका रद्द करण्यात येईल. तसेच, पैशाचे प्रलोभन दाखवून लाभार्थ्यांकडून धान्य खरेदी करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
स्वस्त धान्य दुकानदारांना लवकरच हे धान्य उचलण्याचे आदेश देण्यात आले असून, लाभार्थ्यांनी नियोजित वेळेत धान्य घेऊन सरकारच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.