दुसऱ्या फेरीत १६.७६ टक्केच प्रवेश
‘आयटीआय’ची २२ जुलैपर्यंत मुदत
मुंबई, ता. १९ : राज्यभरात पहिल्या प्रवेश फेरीनंतर सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये दुसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. २२ जुलैपर्यंत या फेरीतील प्रवेशांसाठी मुदत आहे. दोन दिवसांत उपलब्ध ४९ हजार ३४६ जागांपैकी केवळ आठ हजार २७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. प्रवेशाची ही सरासरी अवघी १६.७६ टक्केच आहे.
आयटीआयच्या पहिल्या प्रवेश फेरीदरम्यान एकूण एक लाख ४७ हजार ४३२ जागा होत्या. पहिल्या फेरीसाठी ८२ हजार ८३३ जागा उपलब्ध केल्या होत्या. त्यापैकी ४२ हजार २९५ जागांवर प्रवेश पूर्ण झाले, तर दुसऱ्या फेरीसाठी ४९ हजार ३४६ जागा उपलब्ध झाल्या असून त्यावर २२ जुलैपर्यंत प्रवेश केले जाणार आहेत. दुसऱ्या फेरीत शनिवारी (ता. १९) जुलैपर्यंत प्रवेश घेणाऱ्यांत खासगी आयटीआयमधील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून ती एकूण प्रवेशाच्या २५ टक्के तर शासकीय आयटीआयमधील केवळ १५.३३ टक्के इतकी आहे.
----
तिसरी फेरी २८ जुलैपासून
आयटीआयच्या तिसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया २८ जुलैपासून सुरू होणार आहे, तर चौथी फेरी ६ ते १० ऑगस्टदरम्यान चालणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.