कांदिवली (बातमीदार) : कांदिवली पश्चिम येथील समता क्रीडा भवन येथे समता परिषद, मुंबईचा ४६वा वर्धापन दिवस मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महिला गोविंदा पथकाने पाच थरांची सलामी देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. मल्लखांबपटूंनी प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली. समता परिषदेचे कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी समता परिषदेच्या माध्यमातून चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे येणाऱ्या बांधवांसाठी भोजन व्यवस्था करणे, मुंबई महापालिकेतील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव, कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्ग, प्रशिक्षण शिबिर, सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्काच्या घरांचा लढा, समता परिषदेच्या माध्यमातून पंचशील सहकारी पतपेढी चालवण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.