मुंबई

दोन महिन्यात पाच हजार रुग्ण

CD

अंबरनाथकर तापाने फणफणले
उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांची रीघ

अंबरनाथ, ता. २६ (वार्ताहर) ः सातत्याने हवामानात बदल होत आहे. कधी पाऊस तर कधी उन्हाचा पारा वाढत आहे. त्यातच शहरातील अस्वच्छता यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून अंबरनाथमध्ये तापाने रुग्ण फणफणले आहेत. त्यातच सर्दी, खोकल्याचे व साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खासगी रुग्णालये खचाखच भरली आहेत. तर अंबरनाथच्या कै. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची रीघ लागली आहे. गेल्या दोन महिन्यांत पाच हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी उपचार घेतल्याची नोंद करण्यात आली आहे.

यंदा मे महिन्यातच जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी झालेल्या या पावसाने चाळिशी पार गेलेले तापमान खाली आले; मात्र हा गारवा कायम राहिला नाही व पंधरा दिवसांत पुन्हा तीच उन्हाची झळ सुरू झाली. तर पुन्हा जून महिना सुरू होताच पावसाने हजेरी लावली, यामुळे तापमानात सातत्याने बदल होत असून नागरिकांच्या स्वास्थ्यावर याचा मोठा परिणाम होत आहे. त्यातच शहरात तुंबलेली गटारे, परिसरात खड्ड्यामुळे साचलेले पाणी, जागोजागी साचलेला व कुजलेला कचरा, त्यावर निर्माण झालेली डासांची पैदास या सर्व कारणांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक वारंवार आजारी पडत आहेत. शहरात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून साधारण पाच हजारांपेक्षा जास्त साथीच्या आजारांच्या रुग्णांची कै. बी. जी. छाया या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्याची नोंद केली आहे. पालिकेचे साथरोग अधिकारी राजेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता शहरात स्वच्छता व जनजागृतीसंदर्भात उपक्रम राबवले असून पालिकेकडे साथ रुग्णांची माहिती नसल्याचे सांगितले.

अंबरनाथमध्ये कचऱ्यामुळे व अस्वच्छतेमुळे साथीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये झोपडपट्टीवासीयांचा सर्वात जास्त समावेश असून खासगी रुग्णालये या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. त्यामुळे डॉक्टरांसमोर मोठे आवाहन निर्माण झाले असून लवकरच शहरातील डॉक्टरांची टीम मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची यासंदर्भात भेट घेणार असून यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करणार असल्याचे डॉ. गणेश राठोड यांनी सांगितले.

सर्दी-खोकला तापाचे मे महिन्यात ४२६ तर जूनमध्ये ३४२, तसेच बाह्यरुग्ण २०० असे सुमारे १,००० रुग्ण सापडले. दरम्यान, मलेरियाचे संशयित रुग्ण मेमध्ये १,८२१, जूनमध्ये २,०५१, तसेच डेंगीचा मेमध्ये एकही रुग्ण नाही तर जूनमध्ये ८३ रुग्ण संशयित असल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पाच हजारांपेक्षा जास्त बाह्यरुग्णांनी उपचार घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

Jogendra Kawade : फलटण प्रकरणात पडद्यामागील सूत्रधारांचा पण तपास करा

World Cup 2025: टीम इंडियाला धक्का! सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावल जखमी, चालू सामन्यात सोडावं लागलं मैदान; BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT