भातसा धरणाचे
पाच दरवाजे उघडले
नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा
शहापूर, ता. २६ (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या पाणीपातळीत शनिवारी (ता. २६) १३८.७८ मीटर इतकी वाढ झाली आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे दक्षता म्हणून या धरणाचे पाच दरवाजे सुरुवातीला एक मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता हे दरवाजे आणखी ०.२५ मीटरने वाढवण्यात आले. यातून १६,८२०.५३२ क्युसेक पाणी सोडण्यात आले.
धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्यामुळे भातसा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांना आपत्तीच्या काळासाठी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. सापगाव पूल पाण्याखाली गेल्या आहे. शहापूर आणि मुरबाडचा संपर्क तुटण्याचा धोका असून वाहत्या पाण्यातून पुलावरून न जाण्याच्या सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विनोद कंक यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.