बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी शहरातील अनेक महत्त्वांचे चौक रुंद व प्रशस्त केले. झाडांचे पुनर्रोपण, सिग्नल यंत्रणा, रस्ते रुंदीकरण आदी कामांमुळे चौकांचे सौंदर्य आणि वाहतूक सुरळीत झाली आहे. मात्र, बेजबाबदार नागरिकांमुळे या चौकांमध्ये कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत.
रस्ते, वीज, पाणी या समस्यांव्यतिरिक्त वाहतूक कोंडीची समस्या अनेक वर्षांपासून बदलापूर शहरात आहे. वेगवेगळे रस्ते जोडणारे अनेक चौक परिसर आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवत असल्यामुळे, मागील वर्षी मुख्याधिकारी गायकवाड यांनी वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. सगळ्या चौक परिसराची पाहणी करून शहरातील पर्यावरणप्रेमी, अभियंता व इतर तज्ज्ञांशी चर्चा केली. चौक प्रशस्त करण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. अनेक मोठी आणि जुनी वडाची झाडे जगवण्यात आली. त्यामुळे चौक परिसर रुंद आणि प्रशस्त झाले आहेत. त्यात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्याने शहरातील वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.
पालिकेने रुंदीकरण केलेला चौकांचे सुशोभीकरण करून एक चांगले मॉडेल तयार केले. मात्र शहरातील काही बेजबाबदार नागरिकांमुळे हे चौक परिसर कचराकुंडी बनत आहेत. परिसरातील नागरिक, व्यासायिक हे चौकांमध्ये सर्रासपणे येऊन कचरा टाकत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचा ढीग पाहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.