मुंबई

दागिने चोरीचा १२ तासांत छडा

CD

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : रबाळे पोलिसांनी एका महिलेचे १९ लाख १३ हजारांचे दागिने चोरी प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत यशस्वी तपास केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असून चोरलेला मुद्देमाल महिलेला दिला आहे.
पनवेलमधील करंजाडे येथे राहणाऱ्या शकुंतला गायकर (५८) यांचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. ३१ जुलै रोजी घणसोलीतून त्यांचे १९ लाख १३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल फोन चोरण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाळदे, पोलिस हवालदार वाईंगणकर, कारण काळ, राजेश तडवी आणि राहुल साळुंखे यांच्या पथकाने तपास सुरू केला होता.
----------------------------------------
कामगिरीचे कौतुक
घणसोली ते तळवली परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करून संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत केले. त्यानंतर शुक्रवारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या हस्ते शकुंतला गायकर यांना त्यांचे सर्व दागिने सुपूर्द करण्यात आले. दागिने परत मिळाल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; राज्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रवाशांची होणार कोंडी! रेल्वेनंतर वाहतूक विभागाचा ब्लॉक; खड्डे समस्यांसाठी 'या' मार्गावर ३ दिवस प्रवेश बंद

Elephant Relocation Controversy : कोल्हापूर झालं आता गडचिरोलीचा नंबर? 'माधुरी'नंतर कमलापूर कॅम्पमधील हत्तींबाबत चिंतेचं वातावरण...

ENG vs IND: 'वॉन आणि माझ्यात ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याच्या बातम्या निराधार...' कसोटी मालिकेनंतर वासिम जाफरची पोस्ट चर्चेत

Latest Maharashtra News Updates Live : जिल्हा परिषदेच्या चार हजार ८० जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT