मुंबई

बदलापूर टर्मिनसची मागणी रेल्वेमंत्र्यांच्या दारी!

CD

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ३ : ठाणे जिल्ह्यातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये गणल्या जाणाऱ्या बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांची सध्या अक्षरशः ससेहोलपट होत आहे. दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, अपुऱ्या गाड्या आणि ढासळलेली पायाभूत सुविधा यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्या माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर मांडल्या.
बदलापूर शहरातून मुंबई आणि परिसरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही दीड ते पावणे दोन लाख इतकी झाली आहे. कमी रेल्वे फेऱ्या तुलनेत जास्त गर्दी असे बदलापूर रेल्वेस्थानकातील रोजचे चित्र आहे. बदलापूर स्थानक टर्मिनस म्हणून विकसित करणे, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना बदलापूर स्थानकात थांबा देणे, बदलापूर ते पुणे अशी वंदे भारत एक्स्प्रेस चालू करणे, कल्याण ते बदलापूर व कर्जतदरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर करणे या व्यतिरिक्त इतर अनेक रेल्वे समस्यांबाबत पातकर यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यासंदर्भात सखोल चर्चा केली. या वेळी गडकरी यांनीही या संदर्भात विशेष दखल घेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना स्वतः पत्रव्यवहार करत पातकर यांच्या पत्राचा संदर्भ देत बदलापूरकरांच्या मागण्यांचा पाढा वाचला.

गडकरी यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
बदलापूर रेल्वेस्थानक टर्मिनस म्हणून विकसित करणे, बदलापूर ते पुणे दरम्यान चालणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना सकाळ व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेस बदलापूर स्थानकात थांबा देणे, अंबरनाथ-बदलापूर या स्थानकातून अनेक विद्यार्थी, नोकरदार वर्ग हे बदलापूर ते कर्जत; तसेच बदलापूर ते मुंबई असा प्रवास करतात. त्यामुळे या मागणीचा लवकरात लवकर विचार करण्यात यावा, अशी मागणी केली. गडकरी यांच्या पत्राची रेल्वेमंत्र्यांनी दखल घेतली असून यासंदर्भात बदलापूर स्थानकाची संपूर्ण पाहणी करण्यात येईल. तसेच, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस स्थानकात थांबवणे शक्य असेल तर याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

-------------
अनेक वर्षांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात होत असलेली गर्दी, त्यात बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना होत असलेला त्रास आणि त्यामुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. बदलापूरकरांच्या समस्या सोडविण्यासाठी विनंती केली. गडकरींनीही या संदर्भात लगेच दखल घेऊन, रेल्वेमंत्र्यांना तसा पत्रव्यवहार केला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या पत्राचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बदलापूरकरांसाठी आशा पल्लवीत केल्या आहेत.
- राम पातकर, माजी नगराध्यक्ष

अशा आहेत मागण्या
१) बदलापूर रेल्वे स्थानक टर्मिनस म्हणून विकसित करणे
२) लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना बदलापूर स्थानकात थांबा देणे
३) बदलापूर ते पुणे अशी आठ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालू करणे
४) कल्याण ते बदलापूर व बदलापूर ते कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीगेचे काम युद्ध पातळीवर करणे
५) बदलापूर व वांगणी शहराच्या मध्ये नव्याने कासगाव स्टेशनची उभारणी करणे
६) तासगाव ते कामोठे नवीन रेल्वे सेवा सुरू करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झोपलेले गृहमंत्री जागे होतील अशी अपेक्षा, रोहित पवारांनी व्यक्त केला संताप; मध्यरात्री ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात

ENG vs IND: जो रुट भारतासाठी ठरलाय डोकेदुखी! ३९ वे कसोटी शतक ठोकत केलेत कोणालाच न जमलेले पराक्रम

Mahadevi Elephant : माधुरी हत्तीण कोल्हापूरला परत मिळणार का? कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार? वाचा...

धक्कादायक! 'साेलापुरमध्ये तरुणाने व्हिडिओ पाठवून जीवन संपवले'; दोनच महिन्यापूर्वी विवाह, भलतचं कारण आलं समाेर..

पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण, शिवीगाळ; गुन्हा नोंदवता येणार नाही, पोलिसांचं पत्र

SCROLL FOR NEXT