मुंबई

पालिकेने आम्हाला काय दिले?

CD

खारघर, ता. ४ (बातमीदार) : पनवेल पालिकेने मालमत्ता करासाठी अभय योजना लागू केली आहे. शहरी भागात या योजनेला प्रतिसाद मिळत आहे, पण ग्रामीण भागात मूलभूत सुविधा देण्यात पालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे अभय योजनेला ग्रामस्थांचा विरोध आहे.
पनवेल पालिका अस्तित्वात आल्यानंतर गावाचा विकास होईल, अशी ग्रामस्थांची धारणा होती. पण गेल्या सात वर्षांत गाव आणि पाड्यात विकासाचे कोणतीही कामे केलेले नाहीत. आजही ग्रामीण भागात सिडकोकडून पाणीपुरवठा केला जातो. शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. रस्त्याची कामे झालेली नाहीत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी मलनिःसारण वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. अनेक पथदिव्यांनी डोळे मिटले आहेत. त्यामुळे विकासाच्या नावाने ग्रामीण भागात बोंबाबोंब असताना महापालिका कोणत्या आधारावर भरमसाठ मालमत्ताकर आकारत असल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे.
--------------------------------------------
विरोधाची कारणे
- ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवासी घरांचे एक रुपये तर वाणिज्य वापराचे दोन रुपये मालमत्ता कर आकारला जात होता. त्यामुळे वार्षिक पाचशे ते हजार रुपये मालमत्ता कर वसूल केला जात होता. पण पालिका अस्तित्वात आल्यावर प्रशासनाने चौपट मालमत्ता कर लागू केला आहे.
- पालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. मोर्चा, आंदोलन करण्यात आले; मात्र पालिका प्रशासनाने मालमत्ता कराचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्याचे उत्तर देऊन मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
------------------------------------------------
नागरी सुविधांचा अभाव
खारघर, बेलपाडा, कोपरा, फणसवाडी, चाफेवाडी, बेलपाडा वाडी, हेदोरावाडी आणि ओवे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुर्बी, रांजणपाडा, पेठ, ओवे गाव, खुटूकबांधण, ओवे कॅम्प, धामोळे, घोळवाडी, कातकरी पाड्यात नागरी सुविधांचा अभाव आहे.
-------------------------------------------------
लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले
पालिकेने मालमत्ता कराचा ठराव मंजुरीसाठी आल्यानंतर एकाही लोकप्रतिनिधीने गावांचा विचार केला नाही. ग्रामस्थांच्या जमिनीवर खारघर शहर वसले आहे. काही वर्षे ग्रामपंचायतीच्या दरानुसार मालमत्ता कर वसूल करून हळूहळू वाढवणे आवश्यक होते. शेती, रोजगार, नोकरी नाही. शिक्षण घेऊनही मुले बेरोजगार आहेत. अनेकांनी रिक्षा व्यवसाय निवडला, मात्र वाढत्या रिक्षाचालकांमुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे.
---------------------------------------------------
दोन वर्षांपूर्वी पालिकेकडे दोन घरांचे दोन हजार २०० रुपये मालमत्ता करभरणा केला होता. पालिकेकडून ३० हजारांहून अधिक मालमत्ता कराची नोटीस प्राप्त झाली आहे. गावात कोणतीही विकासकामे नाहीत. त्यामुळे मालमत्ता का भरावा, हा खरा प्रश्न आहे.
- दत्ता दळवी, ग्रामस्थ, मुर्बी गाव
---------------------------------------------------
गाव आणि शहराच्या विकासासाठी प्रत्येकाने मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत काळात ग्रामस्थ नियमितपणे मालमत्ता कर भरणा करीत होते. पालिका अस्तिवात आल्यानंतर सात वर्षांत घनकचऱ्याव्यतिरिक्त परिसरातील गावात कोणतेही विकासाचे काम झाल्याचे दिसून येत नाही.
- केसरीनाथ पाटील, ग्रामस्थ, खारघर गाव
---------------------------------------
पनवेल पालिका क्षेत्रात समाविष्ट ९५ गावांतील मालमत्ताधारकांना पालिकेने अवाजवी मालमत्ता कर आकारला आहे. तो कमी करावा, यासाठी मोर्चे, आंदोलने करण्यात आली. असे असताना पालिकेकडून चौपट मालमत्ता कर लादण्यात आला आहे.
- ॲड. सुरेश ठाकूर, अध्यक्ष, नवी मुंबई ९५ गाव नैना व इतर प्रकल्पग्रस्त समिती व इतर सामाजिक संस्था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

Mumbai Weather: उकाड्यामुळे मुंबईकर हैराण! आता पाऊस कधी दरवाजा ठोठावणार? हवामान विभागाने वेळच सांगितली

Mumbai News: कबुतरखाना कारवाईविरोधात जैन समाज आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा

IND vs ENG 5th Test: शुभमन गिलच्या ७५४, तर हॅरी ब्रूकच्या ४८१ धावा, तरीही दोघांना Player Of The Series पुरस्कार कसा? गंभीरचा 'Role'

Latest Marathi News Updates Live : अंजली दमानिया विरोधात वॉरंट जारी

SCROLL FOR NEXT