महामुंबई मेट्रोवर प्रवासी उदंड
-३९ महिन्यांत २० कोटी जणांचा गारेगार प्रवास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईकरांना आता मेट्रोच्या गारेगार प्रवासाची गोडी लागली आहे. वाहतूक कोंडीशिवाय प्रवास होत असल्याने अनेकजण मेट्रोने प्रवास करत आहेत. त्यानुसार महामुंबई मेट्रोकडून चालवल्या जाणाऱ्या मेट्रो २ अ अंधेरी-दहिसर आणि मेट्रो ७ दहिसर गुंदवली या मेट्रो मार्गावर गेल्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी लोकांनी प्रवास केला आहे. त्यामुळे एमएमआरडीएलाही त्या माध्यमातून मोठा महसूल मिळत आहे.
एमएमआरडीएने अंधेरी-दहिसर-गुंदवली ही मेट्रो मार्गिका उभारली आहे. ३५ किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा २ एप्रिल २०२२ रोजी कार्यान्वित झाला. पश्चिम उपनगरातील कनेक्टिव्हिटी मजबूत करणाऱ्या मेट्रो मार्गावर प्रवास करण्यासाठी मुंबईकरांकडून मोठी पसंती दिली जात आहे. त्यामुळे २ एप्रिल २०२२ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सदर मार्गिकेवर २० कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.
हा विक्रम केवळ आकडेवारीचा नाही, तर मुंबईच्या मेट्रो क्रांतीचा वेगवान प्रवास असल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे. दरम्यान, मेट्रोवर प्रवास करणाऱ्यांमध्ये दररोज कामावर जाणाऱ्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
असे वाढले प्रवासी
- मेट्रोसेवा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसाची प्रवासीसंख्या - १९,४५१
- पहिल्या नऊ महिन्यांतील प्रवासी - १ कोटी
- २५ महिन्यांत - १० कोटी प्रवासी
- ३३ महिन्यांत - १५ कोटी प्रवासी
- ३९ महिन्यांत - २० कोटी प्रवसीसंख्येचा टप्पा ओलंडला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.