मुंबई

पालघरमध्ये आज उत्स्फूर्त बंद

CD

पालघर, ता. १३ (बातमीदार) : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजी पालघरमध्ये निघालेल्या मोर्चावर ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले होते. त्यांना अभिवादन करण्यासाठी पालघरमध्ये दरवर्षी १४ ऑगस्टला उस्फूर्तपणे बंद पाळून हुतात्म्याला वंदन केले जाते. उद्याही (ता. १४) पालघर शहरात उत्स्फूर्त बंद पाळला जाणार आहे

स्वातंत्र्यलढ्यावेळी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्याकरिता पालघर तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. हा मोर्चा सध्याच्या हुतात्मा चौकाजवळ आल्यानंतर ब्रिटिश पोलिसांनी मोर्चा अडवला, मात्र मोर्चातील आंदोलनकर्त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सातपाटी येथील काशिनाथ हरी पागधरे, गोविंद गणेश ठाकूर नांदगाव, रामप्रसाद भीमाशंकर तिवारी पालघर, सुकूर गोविंद मोरे सालवड व रामचंद्र महादेव चुरी हे हुतात्मे झाले होते. त्यांना अभिवादन करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून मूक मोर्चा काढला जातो. हा मोर्चा हुतात्मा चौकाजवळ आल्यानंतर हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून ‘खून के हमारे यारो न भूल जाना, खुशियों में अपनी हमपे आसू बहाते जाना’ हे गीत गाऊन झाल्यावर कोणतीही भाषणबाजी न होता सहभागी लोक निघून जातात, ही प्रथा स्वातंत्र्याच्या काळापासून आजपर्यंत सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 'सातारा जिल्ह्यातील आशिष महांगरे बनला संशाेधक'; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी, जर्मनीत करणार संशोधन

Pune : जिम ट्रेनर तरुणीने दुकानाच्या दारातच केली तरुणाची हत्या, घटनेनंतर स्वत: पोलिसात हजर; मित्रासह दोघांना अटक

Pakistan Independence Day : पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच पसरली शोककळा, हवेत गोळीबारात चिमुकलीसह ३ ठार, ६५ गंभीर जखमी

Chh. Sambhajinagar: “मैं जा रहा हूँ” असा मेसेज पाठवून २३ वर्षीय युवकाने संपवले जीवन; वाळूज एमआयडीसी परिसर हादरला

Satara News: अकरावी प्रवेशासाठी आता ‘विशेष फेरी’; मंगळवारपासून प्रवेश निश्‍चित करता येणार, सुधारित वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT