मुंबई

भावसेच्या सरपंच नयना भूसारे यांचा विशेष सन्मान

CD

भावसेच्या सरपंच नयना भुसारे यांचा विशेष सन्मान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, त्यासोबतच गावामध्ये पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक सुधारणा घडविणाऱ्या राज्यातील सरपंचांचा विशेष सन्मान स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीत होणार आहे. यासाठी शहापूर तालुक्यातील भावसे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच नयना भुसारे यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीमुळे ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर आज होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २१० ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. यात महाराष्ट्रातील १५ सरपंचांचा समावेश असून, यात नऊ महिला सरपंचांचा समावेश आहे. सन्मानित होणाऱ्या सरपंचांनी ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’ ‘मिशन इंद्रधनुष’ यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांचे शंभर टक्के प्रभावी कार्यान्वयन करताना स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबविल्याचाने त्यांची दखल घेत थेट केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाकडून या सर्व सरपंचांचा विशेष सन्मान होणार आहे. यासाठी भावसे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच नयना भुसारे यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीमुळे शहापूर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महिला सरपंच नयना भुसारे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी म्हटले की, मी माझे भाग्य समजते. केंद्रीय पंचायत राज विभागाकडून माझी निवड होईल, याचा स्वप्नातदेखील विचार केला नव्हता. माझ्या गावातील विकासासाठी केंद्र सरकारच्या योजना राबविताना ग्रामस्थ, ग्रामसेवकांसोबत माझे पती अशोक भुसारे यांचीदेखील मोलाची साथ लाभली. यापूर्वी आर. आर. आबा पुरस्कार आणि संत गाडगेबाबा महाराज पुरस्कारदेखील मिळाले आहेत. त्यात आता हा दिल्लीत विशेष निमंत्रणासह विशेष सन्मानित करण्यात येणार असल्याने हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Latest Marathi News Updates: HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठीची मुदत पुन्हा वाढवली!

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Supreme Court: मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख लोकांचे नावं जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT