पालघर, ता. १६ : पालघर पश्चिमेच्या ग्रामीण भागासाठी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीची ठरणाऱ्या नारंगी-जलसार फेरीबोट रो-रो सेवेची रात्रीची फेरी वाढवण्यात आली आहे. आता नारंगी येथून रात्री दहा वाजता, तर जलसार येथून दहा वाजून दहा मिनिटांनी आणखीन एक फेरी शनिवार (ता.१६)पासून सुरू केली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना ही सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या फेरीबोट सेवेमुळे नागरिकांचा तब्बल दीड तासाचा रस्ता प्रवास व फेरा वाचत आहे. केवळ १५ मिनिटांत सफाळे ते नारंगी पोहोचता येणे शक्य आहे. त्यामुळे ही फेरी बोट सेवा महत्वपूर्ण ठरवू लागली आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यामुळे विरारकडे जाणारे नागरिक, शेतकरी, भाजीपाला विक्रेते, विद्यार्थी, रुग्ण यांना फेरीबोट सेवा सोयीची ठरत आहे. सद्य:स्थितीत फेरीबोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू असली तरी महामार्गावरील कोंडी लक्षात घेता वाहन चालक व नागरिक, तसेच प्रवासी या फेरीबोटचा आधार घेत आहेत. या फेरीमुळे प्रवास व वेळ दोन्हीही वाचत आहे. सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन इंजिनियरिंग या कंपनीमार्फत ही फेरी बोट चालवली जाते. आतापर्यंत हजारो नागरिकांनी या रो-रो सेवेमधून प्रवास केला असून ही सेवा या भागासाठी वरदान ठरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.