मुंबई

रुग्णालयातून घरी सोडलेल्या अर्धांगवायूच्या रुग्णाचा मृत्यू

CD

रुग्णालयातून घरी सोडलेल्या रुग्णाचा मृत्यू
संतप्त नातलगांची रुग्णालयाची नासधूस
उल्हासनगर, ता. १७ (बातमीदार) : अर्धांगवायूच्या आजारावर उपचार केल्यावर घरी सोडण्यात आलेल्या रुग्णाचा घरी नेल्यावर काही तासांतच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १६) रात्री उल्हासनगरात घडली. या घटनेने संतप्त झालेल्या नातलगांनी रुग्णालयाची नासधूस सुरू केल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
एका आठवड्यापूर्वी कॅम्प नंबर ४ सरस्वती नगरमध्ये राहणारे लालमन गुप्ता यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांना कॅम्प नंबर ३ मधील क्रिटिकेयर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लालमन गुप्ता यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, मात्र घरी नेल्यावर लालमन गुप्ता यांचा काही तासांनी मृत्यू झाला. या प्रकाराने संतप्त झालेल्या नातलगांनी हॉस्पिटलमध्ये हल्लाबोल करून लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि खुर्च्यांची नासधूस करण्यास सुरुवात केली.
प्रसंगावधान राखत डॉ. गव्हारे यांनी तत्काळ मध्यवर्ती पोलिस ठाण्यात फोनकरून माहिती दिल्यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांनी त्यांच्या टीमसोबत धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती शंकर आवताडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT