मुंबई

खडेगोळवली चाळ परिसराची वाताहत

CD

नाल्याच्या मुख्य प्रवाहाला बाधा
कल्याण, ता. २० (बातमीदार) : विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकासमोरही मोठे कमर्शियल टॉवर निर्माणाधीन आहे. त्यामुळे मुख्य नैसर्गिक प्रवाहाला बाधा होत आहे. परिणामी, साचलेले पाणी मागे फेकले जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. प्रशासनाने विकसकांना इमारतींचे निर्माण करताना सर्व नियमांचे उल्लंघन करण्याची परवानगी दिली आहे का, असा संतप्त सवाल केला. दरम्यान, कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी वालधुनी नदीपात्राची पाहणी केली. विठ्ठलवाडी पुलाजवळ साचलेला कचरा जेसीबीच्या मदतीने काढून टाकण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला.
वालधुनी नदीला आलेल्या पुरामुळे खडेगोळवली विभागातील बहुतांश ठिकाणच्या चाळ परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून जनजीवन विस्कळित झाले होते. घरात पाणी शिरल्याने नागरिकांची वाताहत झाली. १०० फुटी येथील मंगेशी संस्कार समोरील रस्ता, सोनिया कॉलनी, रामकृष्ण कॉलनी, शिवशांती कॉलनी, महावीरनगर व शिवमंदिर परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

Pune News: हे फक्त पुण्यातच! रस्त्यावर शेण साठविल्याच प्रकरण न्यायालयात गेलं अन् .... न्यायालयाने काय दिली शिक्षा?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात सलग १२ व्या दिवशी घसरण, खरेदीची उत्तम संधी? जाणून घ्या आजचा ताजा भाव

योगिता चव्हाणच्या नव्या गणेशगीताचा धडाका! ‘शंकराचा बाळ आला’गाण्यात सैनिक आईच्या भूमिकेत, सोशल मीडियावर व्हायरल

12th Board Students: १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता एनसीईआरटीकडून मिळणार मोफत गणिताचे ‘ट्युशन’

11th Admission 2025: अकरावी प्रवेशाच्या खुल्या फेरीला प्रतिसाद; प्राधान्यक्रमानुसार ८५ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT