कल्याण-डोंबिवलीत १७२.६ मिमी पावसाची नोंद
कल्याण, ता. २० (बातमीदार) : हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मागील दोन ते तीन दिवस ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे बारवी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे कल्याण-डोंबिवलीत, खाडी आणि नदीकिनारच्या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मागील २४ तासांत कल्याण-डोंबिवलीत १७२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यातच बारवी धरणही पूर्ण क्षमतेने भरले असून त्याच्या ११ दरवाजांमधून तब्बल २३६ क्युसेक इतक्या प्रचंड वेगाने पाणी बाहेर पडत आहे. परिणामी, एकीकडे मुसळधार आणि दुसरीकडे बारवी धरणाचे पाणी उल्हास नदीद्वारे कल्याणच्या नदीकिनारी असलेल्या वालधुनी, योगीधाम, रिंगरोड अशा अनेक सखल भागात शिरले आहे. तर पुढे हेच पाणी कल्याण खाडीलाही जाऊन मिळत असल्याने दुर्गाडी गणेश घाट, रेतीबंदर परिसर जलमय झाला. त्यासोबतच शहाड, मोहने, योगीधाम, गौरीपाडा सिटी पार्क, भवानीनगर, कल्याण पूर्वेतील अशोकनगर, छत्रपती शिवाजी महाराजनगर, वालधुनी परिसरातील अनेक चाळी आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.