मराठा समाजात सर्वाधिक
आत्महत्या हे न पटण्यासारखे!
विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा दावा
मुंबई, ता. २० ः महाराष्ट्रात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक होत्या, हा राज्य मागासवर्ग आयोगाचा दावा पटण्यासारखा नाही, असा युक्तिवाद मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी बुधवारी (ता. २०) उच्च न्यायालयात केला.
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत ९४ टक्के मराठा समाजातील असल्याचे निवृत्त न्या. सुनील शुक्रे यांच्या आयोगाने अहवालात म्हटले आहे. त्या मुद्द्यावर आक्षेप घेऊन हा दावा पटण्यासारखा नसल्याचे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ॲड. संचित शुक्ला यांच्या वतीने ॲड. प्रदीप संचेती यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच मूळ आकडेवारी आणि आयोगाची आकडेवारीत तफावत असल्यचेही ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देताना आयोगाने त्यांची तुलना खुल्या वर्गासोबत केली. मराठा समाज हा कधीच आर्थिक अथवा शैक्षणिकदृष्ट्या मागास नव्हता. त्यामुळे मराठा समाजाला इतक्या तप्तरतेने आरक्षण देण्याची गरज नव्हती किंवा कोणतीही अनन्यसाधारण, अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली नसतानाही त्यांना आरक्षण देण्यात आल्याचा पुनरुच्चारही संचेती यांनी केला; परंतु वेळेअभावी त्यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ न शकल्याने न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी १३ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.