मुंबई

भिवंडी महानगरपालिका विकत घेते पिण्याचे पाणी

CD

भिवंडी महानगरपालिका विकत घेते पिण्याचे पाणी

अन पावसाळ्यात वाहतो मनपाचा वऱ्हाळा तलाव
पंढरीनाथ कुंभार
भिवंडी, ता. २० (बातमीदार) : भिवंडी शहरास पाणीपुरवठा करणारा महानगरपालिकेचा एकमेव वऱ्हाळा देवी तलाव गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काठोकाठ भरला असून आता त्यामधील पाणी ओसंडून वाहत आहे. दररोज या तलावातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिका इतर मार्गाने शहरातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी विकत घेत असून महानगरपालिकेने आधीच नियोजन केले असते तर हे वाया जाणारे पाणी साठवून ते नागरिकांना पिण्यासाठी वापरू शकले असते.

भिवंडीतील कामतघर परिसरात महानगरपालिकेचा सुमारे ५७ एकरचा वऱ्हाळादेवी तलाव असून त्यापैकी सध्या ५४ एकर जागेत तलावामध्ये पावसाचे पाणी साचते. या तलावात पाणी साचण्याची क्षमता ६२८५ मिलिलिटर असुन पावसाळ्यात या तलावात पूर्णपणे भरल्यामुळे हि क्षमता संपते आणि त्यानंतर पावसाचे पाणी ओसंडून वाहते. भिवंडी मनगरपालिका असताना शहराची लोकसंख्या कमी होती. त्यामुळे विस्तृत अशा तलावाचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरत होते. मात्र शहराची लोकसंख्या वाढली. नगरपालिकेची महानगरपालिका झाली अन तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली तलावात अतिक्रमण झाले. परिणामी तलावात पाणी साचण्याची क्षमता कमी झाली. ३० वर्षांपूर्वी शहरास दररोज २५ एमएलटी पेक्षा जास्त पाणी पुरवठा करणारा तलाव सध्या प्रतिदिन ३ ते ५ एमएलटी पाणी शहरातील नागरिकांसाठी पुरवत आहे. त्यामुळे मनपा स्टेम कडून ७३ एमएलटी आणि मुंबई महानगरपालिकेकडून ४२ एमएलटी पाणी विकत घेत आहे. त्यामध्ये देखील पाणी चोरीचे प्रमाण जास्त असल्याचे पथकाच्या कारवाई नंतर दिसून येते. भिवंडीत सध्या मोठ्या संख्येने विकास कामे होत असल्या बहुमजली इमारतींची कामे सुरु आहेत. अशा स्थितीत पाणी साठविण्याचे आणि पुरवठा करण्याचे नियोजन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने करणे आवश्यक आहे. गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांकडून वऱ्हाळा तलावातील अनावश्यक अतिक्रमणे दूर करून, तलावाची खोली वाढवावी. तलावातील प्रदूषण नष्ट करावे. तसेच तलावाची पाण्याची क्षमता देखील वाढविण्याची मागणी केली जात आहे. हि क्षमता वाढविल्यास किमान शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करता येईल.

--------------------

भिवंडी महानगरपालिकेच्या वऱ्हाळा तलावातील गाळ काढून त्याची खोली वाढविणे आणि सुशोभीकरण करण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे प्रयोजन देऊन मागणी केली आहे. हा निधी आल्यावर हे काम करून तलावात पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे.
- संदीप पटणावर, प्रभारी कार्यकारी अभियंता
भिवंडी महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT