मुंबई

मिठीचा पूर ओसरल्याने रहिवाशी परतले

CD

पूर ओसरल्याने रहिवासी परतले
नव्याने संसार उभारण्याचे आव्हान; पुस्तके भिजल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडाली
जीवन तांबे, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मिठी नदीचा पूर ओसरल्याने क्रांतीनगरमधील जे लोक तात्पुरते विस्थापित झाले होते. ते आता सर्वजण घरी परतले आहेत; मात्र घरात गाळ आणि कचरा साचला आहे. घरातील साहित्य वाहून गेल्याने आता संसार नव्याने उभारण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. दुसरीकडे या परिसरात रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

 मंगळवारी (ता. १९) मिठी नदीने रौद्र रूप धारण केल्याने  क्रांतीनगर, संदेशनगर, सोनापूर गल्लीतील घरांमध्ये पाणी शिरले होते. पालिका प्रशासनाने या परिसरातील ६०० हून अधिक रहिवाशांचे  कुर्ला बैल बाजार येथील पालिकेच्या मगनलाल मथुराम म्युनिसिपल स्कूल व शिशु विकास शाळेत स्थलांतर केले होते. बुधवारपासून मिठी नदीची पाण्याची पातळी कमी झाल्याने उघड्यावर टाकून आलेल्या संसाराच्या चिंतेने ग्रासलेल्या रहिवाशांचे पाय घराकडे वळू लागले आहे. घर उघड्यावर टाकून गेल्यामुळे वस्तू चोरीला गेल्या आहेत. तसेच घरातील सगळे साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाहून गेलेला संसार पुन्हा कसा उभा करायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

तात्पुरत्या निवाऱ्यात पालिकेने बेड, अन्नाचे पॅकेट, वैद्यकीय सेवा आणि कपडे आणि टॉवेल असलेल्या मदत बॅगची व्यवस्था केली असे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात आम्हाला योग्य अन्न व सुविधा देण्यात आलेली नाही. कुठलाच पर्याय नसल्याने पालिकेच्या शाळेत राहिलो. गेल्या ५० वर्षांपासून घरात पाणी शिरत आहे. या वेळी घरात काहीही शिल्लक उरलेले नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.


पाणी शिरल्यामुळे भिंतींना भेगा  पडल्या आहेत. घर कधीही कोसळून एखादी घटना घडु शकते. सरकार आमचा बळी जाण्याची वाट पहात आहे की काय?
रविना शिर्के, स्थानिक राहिवासी
....................
मंगळवारी अचानक घरात पाणी शिरल्यामुळे जीव वाचविण्यासाठी बाहेर पळून गेलो. घरातील सगळे साहित्य वाहून गेले, पैसे व रेशनिंग साहित्य ओले झाले आहे. अंगावर कपडे नाहीत. झोपायला चादर नाही.
-मीना कनोजिया, रहिवासी

इयत्ता आठवीत शिकत आहे. पुस्तके वाहून गेली आहेत. कपडे नाहीत, मला काही दिवस शाळेत जाता येणार नाही.
-अनिता शर्मा (विद्यार्थी)

कित्येक दिवसांपासून आम्ही अंधारात राहत आहोत. कपडे, पुस्तके वाहून गेली आहेत. घरात एक साहित्य  उरलेले नाही. शाळेत फक्त खिचडी देण्यात आली.
-पायल वाघमारे (रहिवासी)
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT