गणपती विशेष गाड्या आजपासून धावणार
प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा रेल्वेतून होणारा प्रवास सुरळीत व्हावा, यासाठी मध्य रेल्वेकडून आजपासून गणपती विशेष गाड्या धावणार आहेत. पुढील २१ दिवसांत तब्बल ३६७ गाड्या प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या प्रचंड गर्दीची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. आरपीएफ आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे एकूण २०० अतिरिक्त जवान तैनात करण्यात येणार असून, केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथेच ६० जवान नियुक्त करण्यात आले आहे. एलटीटी, पनवेल, दादर, ठाणे व कल्याण या गर्दीच्या स्थानकांवरही सुरक्षेसाठी अधिक बळकटी देण्यात आली आहे. गणपती विशेष गाड्यांचा प्रारंभ २२ ऑगस्टला होत असून, पहिली गाडी सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी २.२० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. शेवटची गणपती विशेष गाडी ११ सप्टेंबरला सुटेल. या काळात दररोज सरासरी १६ ते १७ गणपती विशेष गाड्या चालवल्या जातील.
...
मध्य रेल्वे सज्ज
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, तिकीट खिडक्यांवर अतिरिक्त कर्मचारी, माहिती देण्यासाठी विशेष हेल्पडेस्क, तसेच प्लॅटफॉर्मवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी होमगार्ड यांची मदत घेतली जाणार आहे.
...
गाड्या हाउसफुल
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांची रेल्वेवर प्रचंड गर्दी होते. मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण असल्याने बहुसंख्य प्रवासी रेल्वेलाच प्राधान्य देतात. त्यामुळे या वर्षीही गाड्यांची आरक्षणे काही मिनिटांतच फुल झाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.