घरफोडीप्रकरणातील तिघांना अटक
साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : वालधुनी परिसरात एप्रिल महिन्यात झालेल्या घरफोडीप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी तपास करून तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे सात लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
१६ एप्रिल रोजी दुपारी १२ ते साडेचार दरम्यान चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूम व किचनमधील कपाटातून सोने, चांदीचे दागिने व इतर वस्तू, असा एकूण १२ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल चोरला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी काळी-लाल दुचाकीवरून आल्याचे आढळून आले. त्यानंतर तपास पथकाने नालासोपारा येथे साजीद शेख व त्याचा साथीदार सावेज शेख यांचा शोध घेतला. ८ ऑगस्ट रोजी साजीदला अटक केली. पुढील तपासात ऋषीकेश चौधरी आणि प्रिती कदम यांनाही अटक केली असून, सावेज शेख अद्याप फरार आहे. पोलिसांनी सुमारे १० तोळे सोने, एक किलो चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू असा सुमारे सात लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.