मुंबई

दुपारी १.५३ वाजेपर्यंत मुहूर्त

CD

पालघर, ता. २६ : गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाला बुधवार (ता. २७)पासून प्रारंभ होत आहे. श्रीगणेश चतुर्थीला ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४.५० वाजल्यापासून ते दुपारी १.५३ वाजेपर्यंत गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे. या वेळेत आपल्या व गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना-पूजन करता येईल, असे दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. यंदाचा गणेशोत्सव ११ दिवसांचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रीगणेशाची स्थापना प्रातःकालापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी करता येते. त्यासाठी कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतरदेखील करता येऊ शकते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे, असे नाही. घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वीतभर उंचीची आणि आसनस्थ असावी, असे दाते यांनी सांगितले.

गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेशमूर्तीचे विसर्जन पाण्यामध्ये करावे, असे धर्मशास्त्र सांगते. वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याचा नियम नसल्याने तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umarga Crime : महाराष्ट्र ग्रामीण बँकेची तिजोरी फोडली; नाईचाकूर शाखेतून चोरट्यांनी केले १९ लाख लंपास

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी चार वेळा फोन केला, पण मोदींनी दिला नकार; जर्मनीच्या वृत्तपत्राचा दावा

Shri Barabhai Ganpati : पेशवेकालीन परंपरेचे प्रतीक! श्री बाराभाई गणपती; १३५ वर्षांची अखंड मानाची परंपरा अकोल्यात आजही सुरू

Wall Collapse : मिरजेत भिंतीचे बांधकाम कोसळून कामगाराचा मृत्यू; सहा जण जखमी

Latest Maharashtra News Updates: पुलांवरून गणेश मिरवणूक नेताना काळजी घ्या, महापालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT