राज्यातील सहा बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा
मुंबई बाजार समितीचा समावेश
तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : राज्य सरकारने राज्यातील सहा प्रमुख बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली, नागपूर आणि नाशिक या बाजार समित्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, लवकरच याबाबतची अधिसूचना जारी केली जाईल. राष्ट्रीय दर्जा मिळाल्याने या बाजार समित्यांचे महत्त्व अधिक वाढणार आहे.
एकीकडे बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळत असताना दुसरीकडे त्यामधील कथित गैरव्यवहारांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पणन संचालकांना पत्र लिहून मुंबई बाजार समितीमधील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय दर्जा देण्यापूर्वी बाजार समित्यांमधील आर्थिक अनियमितता आणि घोटाळे रोखले जावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
मुंबईतील कथित घोटाळे चर्चेत
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) १५० कोटी रुपयांच्या गाळे विक्री घोटाळ्याबरोबरच ७५ कोटींच्या रस्ते काँक्रीटीकरण प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणांची गंभीर दखल घेत पणन संचालक विकास रसाळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच गाळे विक्रीलाही स्थगिती दिली आहे.
घोटाळे रोखण्याची राजू शेट्टींची मागणी
पुणे आणि मुंबई बाजार समित्यांमध्ये निविदा प्रक्रिया काढण्याची घाई होत असल्याचा आरोपही केला जात आहे. काही कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिले जात असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यानुसार राजू शेट्टी यांनी बाजार समित्यांमधील या सर्व गैरव्यवहारांची तातडीने चौकशी करून राष्ट्रीय दर्जा मिळण्यापूर्वी आर्थिक अनियमितता रोखण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.