महागाईच्या संकटाचे हरण
भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव आवाक्यात
तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) : गणेशोत्सवात भाजीपाल्याला मागणी वाढत असल्याने घाऊक बाजारात भाज्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे सध्या बाजारात ५०० ते ६०० गाड्यांची आवक होत असून भाज्यांचे भाव आवाक्यात आल्याने गणेशोत्सवातच महागाईच्या संकटाचे हरण झाले आहे.
श्रीगणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भाजीपाल्याच्या मागणीत मोठी वाढ होत असते. यंदाही वाशीतील घाऊक बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. गणेशोत्सव सुरू होत असल्याने भाजीपाला बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी असून घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाच्या महापूजा असल्याने मोठ्या प्रमाणात भाज्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव नियंत्रणात असल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे.
----------------------------------------
भाजीचे प्रकार भाव
वांगी १००
फ्लॉवर १२०
टोमॅटो १००
गवार १२०-१५०
हिरवा मटार २४०
फरसबी १५०
गवार १००
कोबी ३० ते ४०
तोंडली १००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.