ठराविक पक्षाच्या फायद्यासाठी प्रभाग रचना
नवी मुंबई भाजपाची प्रभाग रचना बदलण्याची मागणी
तुर्भे, ता. ८ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली प्रारूप प्रभाग रचना ठराविक राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी नियम आणि निकष डावलून बनवण्यात आल्याचा आरोप नवी मुंबई भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. ही प्रभाग रचना बदलण्याची मागणी करण्यात आली आहे
माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह भाजपाच्या शिष्टमंडळाने आज महापालिकेकडे हरकती आणि सूचना नोंदवून नियमानुसार प्रभाग रचना बदलण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने विहित केलेले निकष डावलून भाजपाला नुकसान होईल या दृष्टीने प्रभाग फोडण्यात आले आहेत. तर दुसरीकडे ठराविक पक्षाचे नगरसेवक सुरक्षित राहतील आणि त्यांना फायदा होईल, अशा पद्धतीची प्रभाग रचना हेतू पुरस्सर करण्यात आली आहे.
लोकसंख्येचे आणि भौगोलिक सीमांचे निकष डावलले आहेत. भाजपच्या वतीने प्रारूप प्रभाग रचनेचा तांत्रिक आणि खोलवर अभ्यास करून नियमानुसार निष्पक्ष प्रभाग रचना सादर केली आहे. माजी महापौर सागर नाईक यांनी गॅरी मांडरिंग या संकल्पनेचा उल्लेख करून एखाद्या पक्षाला थेट फायदा पोहोचवण्यासाठी अशा प्रकारची प्रभाग रचना करण्यात आल्याचे सांगितले. प्रभाग रचना करणाऱ्यांच्या क्षमतेबद्दलच शंका येत असल्याची टीका त्यांनी केली. आम्ही सदोष प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना दाखल केल्या असून जर ही सदोष प्रभाग रचना बदलली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा सागर नाईक यांनी दिला. नवी मुंबईमध्ये प्रथमच पॅनल पद्धत लागू केल्याने प्रभाग रचना पारदर्शक आणि निष्पक्ष करण्याची मागणी संजीव नाईक यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.