मुंबई

गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनारे झाले स्वच्छ

CD

गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनारे झाले स्वच्छ
स्थानिक प्रशासनासह सामाजिक संस्थांचा पुढाकार
अलिबाग, ता. १० (वार्ताहर) ः गणपती विसर्जन झाल्यानंतर अलिबागसह जिल्ह्यातील समुद्रकिनारे आणि परिसराची स्वच्छता करण्यासाठी स्थानिक प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे. त्यामुळे समुद्रकिनारे साफ होण्यास मदत झाली असून, सध्या जिल्ह्यातील किनाऱ्यांवर एकही मूर्ती अथवा निर्माल्य नसल्याने भाविकांकडून समाधान व्‍यक्‍त केले जात आहे.
यंदा अलिबागमध्ये मोठ्या धूमधडाक्‍यात गणेशोत्‍सव साजरा झाला. शेकडो घरगुतीसह मंडळांतील गणरायांची अलिबागकरांनी मनोभावे पूजा केली. त्‍यानंतर दीड, पाच, सात आणि ११ दिवसांच्या गणरायाचे विसर्जन मोठ्या उत्‍साहात पार पडले. अनेक घरगुती गणरायाचे विसर्जन यंदा प्रशासनाने तयार केलेल्या कृत्रिम तलावामध्ये करण्यात आले. यंदा प्रशासनाकडून सहा फुटापर्यंत असणाऱ्या गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करण्याची सक्‍ती करण्यात आली होती. त्‍यामुळे काही ठिकाणी भाविकांनी रोष व्‍यक्‍त केला. पर्यावरणाच्या रक्षणासाठी काही भाविकांनी मात्र शासनाच्या या निर्णयाचे स्‍वागत करून मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन केले. दरवर्षी विसर्जनानंतर शहरातील कृत्रिम व नैसर्गिक तलावांसह समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर निर्माल्‍याचा कचरा होतो. अनेक मूर्ती भग्न अवस्‍थेत समुद्राच्या लाटांनुसार किनाऱ्यावर येतात. त्‍या वेळी प्रशासनाला दोष दिला जातो. यंदा मात्र रायगडमध्ये गणपती विसर्जनानंतर स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन स्वच्छता केली. विसर्जनापूर्वी मूर्तीवरील सजावटीचे साहित्य वेगळे करून त्‍याची विल्हेवाट लावली. प्रशासनाकडून कचरा संकलन, निर्माल्य व्यवस्थापन आणि आवश्यक सुविधा पुरवल्या गेल्या. जैविक, विघटनशील साहित्य पुनर्वापरासाठी किंवा कंपोस्टिंगसाठी वेगळे ठेवावे आणि अजैविक साहित्य वेगळ्या पिशव्यांमध्ये जमा करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्याचे नागरिकांकडून पालन झाल्याने स्वच्छता अभियानास मदत झाली.
.................
चौकट :
पर्यावरण जनजागृती
अलिबाग नगर परिषदेने कृत्रिम तलाव बांधून समुद्रात विसर्जन करण्याऐवजी तिथे मूर्ती विसर्जनासाठी प्रोत्साहन दिले. यातून नागरिकांमध्ये पर्यावरणाची काळजी घेण्याची जनजागृती केली गेली. अनेक स्वयंसेवी संस्था आणि जागरूक नागरिकांनी विसर्जन झाल्यानंतरच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT