उल्हासनगर, ता. ९ (बातमीदार) : लोक अदालतच्या माध्यमातून आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने शनिवारी (ता. १३) एकदिवसीय अभययोजना लागू केली आहे. या योजनेत मालमत्ता कराची एकत्रित रक्कम भरल्यास त्यावर १०० टक्के व्याज माफ करण्यात येणार आहे, अशी माहिती मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त विशाखा मोटघरे यांनी दिली.
मागील वर्षी मालमत्ता कराची वसुली तब्बल १२६ कोटी रुपयांवर झाली होती. ही कामगिरी तत्कालीन आयुक्त अजीज शेख, विकास ढाकणे आणि आयुक्त मनीषा आव्हाळे, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारक व संकलक नीलम कदम यांनी केली होती. या रेकॉर्डला गवसणी घालण्यासाठी यावर्षी ऑगस्टमध्ये मालमत्ता कराची एकत्रित रक्कम भरल्यास त्यावर ५ टक्के सूट अशी अभययोजना राबवण्यात आली. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विशाखा मोटघरे, कर निर्धारक व संकलक मयुरी कदम, उपकर निर्धारक व संकलक नितेश रंगारी यांनी ही योजना राबवली. या योजनेतून १७ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. ५ टक्के सुटीच्या योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच, शनिवारी एकदिवसीय अभय योजनेतून किती वसुली होणार याकडे पालिकेचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.