मुंबई

गणेशोत्सवात संकलित ६३ टन निर्माल्यापासून खतनिर्मिती

CD

गणेशोत्सवात संकलित ६३ टन निर्माल्यापासून खतनिर्मिती
पर्यावरणपूरक उपक्रमातून नवी मुंबईतील उद्याने बहरणार
नेरूळ, ता. १० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवात पर्यावरणपूरकतेवर विशेष भर दिला. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या ‘पर्यावरणपूरक व प्लॅस्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याच्या आवाहनाला नवी मुंबईकरांनी प्रतिसाद दिला. त्याचा परिणाम यंदा एकूण ६३.६९५ टन निर्माल्याचे संकलन झाले. विशेष म्‍हणजे या निर्माल्यापासून खतनिर्मिती करून ते शहरातील उद्यानांसाठी वापरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी यंदा पर्यावरण जपण्यासाठी जबाबदारीने सहभाग नोंदवला. शाडू मातीच्या मूर्तींचा आग्रह धरून अनेकांनी ‘पर्यावरणमित्र’ नागरिक म्हणून गौरव मिळवला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. यासाठी शहरातील २२ नैसर्गिक आणि १४३ कृत्रिम तलावांवर स्वतंत्र सोय करण्यात आली होती. त्याचप्रमाणे विसर्जन स्थळांवर ‘ओले’ आणि ‘सुके’ अशा दोन वेगवेगळ्या निर्माल्य कलशांची सोय केल्याने संकलनाची प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध झाली. चारही विसर्जन दिवसांमध्ये नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. गौरी विसर्जन व सातव्या दिवसाच्या विसर्जनात सर्वाधिक २४.४४० टन निर्माल्य जमा झाले. दीड दिवसाच्या विसर्जनात १४.२०५ टन, अनंत चतुर्दशीच्या दहाव्या दिवसाच्या विसर्जनात १४.०७० टन, तर पाचव्या दिवशी १०.९८० टन निर्माल्य संकलित झाले. या आकडेवारीतून नागरिकांचा पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्पष्ट दिसून आला.
........................
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुढाकार
निर्माल्याच्या संकलनासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम यशस्वी केली. संकलित निर्माल्य तुर्भे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून, शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे कंपोस्ट खत तयार केले जात आहे. हे खत पुढील काही दिवसांत शहरातील उद्यानांमध्ये वापरण्यात येणार आहे. याशिवाय डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने धारण तलाव (कोपरखैरणे) तसेच कोपरी व महापेगाव तलाव परिसरातील फुलांचे निर्माल्य स्वतंत्ररीत्या गोळा करून त्यापासून खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे.
.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT