गणेशोत्सवातील फलक अद्याप जैसे थे
कांदिवली परिसराचे विद्रूपीकरण
कांदिवली, ता. १७ (बातमीदार) ः गणेशोत्सव आणि इतर सणांमध्ये शहरात जणू बॅनरबाजीची सर्वच राजकीय पक्षांकडून स्पर्धा सुरू असते. यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई शहरासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी लावलेले अनधिकृत शुभेच्छांचे फलक अद्याप तसेच असल्याने कांदिवली परिसराचे विद्रूपीकरण सुरू आहे.
अनधिकृत फलक हटवण्यासाठी मनुष्यबळ आणि वाहने कमी असल्याने कारवाई संथ गतीने सुरू असल्याची माहिती पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी दिली. अनंत चथुर्दशीच्या तिसऱ्या दिवसापासून पालिकेच्या अतिक्रमण विभागाने फलक काढण्याची धडक मोहीम हाती घेतली. एक वाहन, तीन ते चार कर्मचारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फलक हटवत असून, एका आठवड्यात १४ वाहने फलक काढण्यात आले आहेत. यावरून कांदिवली विभागात अनधिकृत फलकबाजी किती मोठ्या प्रमाणात होते, हे स्पष्ट झाले आहे. अजूनही फलक काढण्याचे काम सुरूच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.