खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी
वाडा, दि. १७ (बातमीदार) : भिवंडी-वाडा महामार्गावरील खुपरी गावाजवळ खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात स्मित ऊर्फ गणू आगिवले (वय १९) या तरुणाचा आज मृत्यू झाला. तो सकाळी आपल्या दुचाकीवरून कामावर जात असताना खुपरी गावाजवळ खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात एका कंटेनरखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर ६००हून अधिक लोकांचा बळी गेल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी ठेकेदार कंपनी ईगल आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तसेच पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.