मानाची पैठणी जिंकण्याची संधी
नवरात्रात ‘सकाळ’तर्फे नवरंग स्पर्धा
नवी मुंबई, ता. २० ः नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. यानिमित्ताने आदिशक्तींच्या विविध रूपांचे पूजन केले जाते. नऊ दिवस नवचैतन्य संचारलेले असताना ‘सकाळ’च्या माध्यमातून श्री दीपक साडीज पनवेल यांच्या सहयोगाने नवरात्र नवरंग स्पर्धा होणार आहे.
स्त्री हे आदिशक्तीचे रूप आहे. सध्याची स्त्री विविध आघाड्यांवर संघर्ष करीत असते. तिचा हा प्रवास सुखकारक व्हावा, यंदाचा नवरात्र उत्सव तिच्यासाठी विशेष ठरावा म्हणून ‘सकाळ’ ही प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने महिलांसाठी विशेष स्पर्धा भरवली जाणार असून नवरात्रात मानाची पैठणी जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.
----------------------------------
स्पर्धेसाठीचे निकष
- प्रत्येक दिवसाचे निगडित रंगाच्या साड्या परिधान करून त्याचे ग्रुप फोटो ‘सकाळ’ कडे पाठवायचा आहे. ग्रुपमधून निवडलेल्या एका महिलेचा महिलेचा डोक्यावर मुकुट असलेला फोटो प्रसिद्ध केला जाईल. ती महिला त्या दिवसाच्या पैठणीची मानकरी असेल.
- विजेत्यांना ‘सकाळ’कडून संपर्क साधला जाईल. नऊ दिवसातील सर्व फोटोमधून एक भाग्यवान विजेते निवडण्यात येणार असून तिला बंपर बक्षीस म्हणून खास पैठणी देण्यात येणार आहे. नवरात्र संपल्यानंतर नऊ विजेत्या व बंपर विजेते यांना श्री दीपक साडी पनवेल येथे पैठणी बक्षीस देण्यात येईल. विजेत्यांनी फोटो प्रसिद्ध झालेला ‘सकाळ’चा अंक जपून ठेवावा.
--------------------------------
स्पर्धकांसाठी महत्त्वाचे
- फोटो खाली ग्रुपचे नाव. ठिकाणाचा उल्लेख असावा.
- जुने फोटो पाठवू नये.
- रोज दुपारी तीनच्या आत ग्रुप फोटो पाठवावा.
- व्हाट्सअप क्रमांक केवळ फोटो पाठवण्यासाठी फोन करू नये.
- फोटो निवडीचे सर्व अधिकार ‘सकाळ’ कडे असतील.
---------------------------
फोटो पाठवण्यासाठी व्हाट्सअप नंबर
८८८८८४९२२३