मुंबई

साहित्यात बोली भाषा वापरली पाहिजे : विजय जोशी

CD

साहित्य लिहिताना बोलीभाषा वापरली पाहिजे : विजय जोशी
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : आरोग्यासाठी हास्य फार गरजेचे असतं. ताणतणाव कमी होण्यासाठी आणि मनाला आराम मिळवण्यासाठी हास्य खूप फायदेशीर असतं. कवींनी कविता लिहिताना उपहास, विरोधाभास किंवा थोडा मार्मिकपणा वापरून हास्य निर्माण करावं, असं ज्येष्ठ कवी विजय जोशी यांनी म्हटले. कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ‘विनोदी काव्य संमेलनात’ विजय जोशी यांनी आपल्या अनुभवातून हे सांगितलं. त्यांनी पुढे म्हटले, ‘‘आजकाल लोक जास्त करून वृत्तबद्ध कविता आणि गझल वाचायला लागले आहेत. गझलच्या प्रेमात पडणे ठीक आहे, पण गझलच्या व्यसनात पडू नका.’’

त्यांनी बोलीभाषेत साहित्य लिहिण्याचं महत्त्वही सांगितले. असे केल्याने बोलीभाषा जपायला मदत होते, नाहीतर ती हळूहळू नामशेष होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ते म्हणाले, “कविता म्हटले की लोकांच्या मनात सहसा शृंगार, करुणा किंवा वीर रस येतो, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडा हास्यरसाचा जल्लोष करणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमात लेखक किरण फाटक यांच्या ‘बोधामृतमंथन’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. विविध भागांतून आलेल्या कवींनी विनोदी कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. समीर गुघाटे, प्रदीप चौरे, अनंत जोशी, सुधाकर कांबळी आणि पद्माकर भावे यांनी कार्यक्रमात हशा-खेळ करून मजा आणली. कार्यक्रमाला वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, बाळकृष्ण धुरी, विजयसिंह परदेशी आणि ग्रंथसेविका उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

SCROLL FOR NEXT