मुंबई

डम्पिंग ग्राउंडला शहरी जंगलाचे कवच!

CD

प्रकाश लिमये, भाईंदर
उत्तन येथील धावगीच्या डोंगरावर मिरा-भाईंदर महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड आहे, तसेच घनकचरा प्रक्रिया प्रकल्पदेखील आहे. या दोन्हीमधून दुर्गंधी, तसेच प्रदूषणही होते, अशी स्थानिकांची कायमची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर त्याठिकाणी होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका डम्पिंग ग्राउंडभोवती मियावाकी संकल्पनेतून शहरी जंगलाचे कवच निर्माण करत आहेत.

उत्तनच्या केशवसृष्टी संस्थेच्या सहकार्याने व एचडीएफसी लाईफ कंपनीच्या सीएसआर निधीतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. डम्पिंग ग्राउंडवरील २५ हजार चौरस फूट जागेवर महापालिकेकडून मियावाकी उद्यानाची निर्मिती केली जात आहे. ही एक जपानी संकल्पना असून त्याद्वारे शहरांमध्ये कमी कालावधीत दाट जंगलाची निर्मिती केली जाते. या संकल्पनेतून अवघ्या तीन वर्षांत झाडे मोठी होतात. केशवसृष्टी ही संस्था महापालिकेसाठी या उद्यानाची निर्मिती करत आहेत. उद्यानात भारतीय व विशेष करून सुमारे ५० स्थानिक प्रजातींची आठ हजार ६०० झाडे लावली आहेत. त्यात फुलझाडे व फळझाडांचा समावेश आहे. या झाडांमुळे परिसरातील हवा शुद्ध होण्यास मदत होणार आहेच, शिवाय या झाडांकडे विविध पक्षी, फुलपाखरे आकृष्ट होऊन नैसर्गिक वातावरण निर्मिती होणार आहे व पर्यावरण संवर्धनास मोलाचा हातभार लागणार आहे. याचा परिणाम म्हणून या भागात होत असलेल्या प्रदूषणाला अंकूश लगणार आहे.

झाडांसाठी सेंद्रीय खताचा वापर
झाडांना पोषक द्रव्ये मिळावीत, तसेच जमिनीचा कस वाढावा, यासाठी केशवसृष्टी ‘ब्लॅक गोल्ड’चा (सेंद्रीय खत) वापर करत आहे. केशवसृष्टी संस्थेच्या गोशाळेमध्ये मोठ्या प्रमाणात शेण उपलब्ध होते. त्यापासून खतनिर्मिती केली जाते. त्याचप्रमाणे मिरा-भाईंदरमधील मंदिरे, धार्मिक उत्सव यातून गोळा होणाऱ्या निर्माल्यापासूनही संस्था खतनिर्मिती करते. संपूर्ण सेंद्रीय असलेल्या या खतात कार्बनची मात्रा अधिक असते, ज्यामुळे झाडे अधिक जोमाने वाढतात व जमिनीचा कसही वाढतो. त्यामुळे या खताला ‘ब्लॅक गोल्ड’ असे म्हटले जाते, अशी माहिती केशवसृष्टीचे निळकंठ अय्यर यांनी दिली.

तणावर नियंत्रण
झाडे वाढत असताना त्याच्या आसपास तणही वाढते, जे झाडांच्या वाढीला अटकाव करते. हे तण वाढू नये, यासाठी आच्छादन (मल्चिंग) करण्यात आले आहे. त्यासाठी संपूर्ण लागवड झालेल्या जागेवर प्लॅस्टिकचे आवरण (शीट) लावण्यात आले आहे. हे प्लॅस्टिक तणवृद्धीला अटकाव करते व झाडांची वेगाने वाढ होते.

मिरा-भाईंदर शहरात पर्यावरणरक्षणासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यात डम्पिंग ग्राउंड येथील मियावाकी संकल्पनेवरील वॄक्ष लागवड या उपक्रमाचा समावेश आहे. या उपक्रमामुळे प्रदूषणाला अटकाव होणार आहे व पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT