मुंबई

दि. बा. पाटलांच्या नावाची घोषणा नाहीच!

CD

दि. बा. पाटलांच्या नावाची घोषणा नाहीच!
प्रकल्पग्रस्तांच्या उत्साहावर विरजण
पनवेल, ता. ८ (बातमीदार) ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (ता. ८) उद्‍घाटन झाले. या वेळी संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता. भगवे कमळ आणि झेंडे घेऊन कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. प्रकल्पग्रस्तांच्या आनंदावर मात्र विरजण पडले. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होती, परंतु नावाची घोषणा न झाल्याने भूमिपुत्र नाराज झाले.
दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले. रायगड, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, शहापूर या भागातून हजारो नागरिक या सोहळ्यास उपस्थित होते. स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी सांगितले, की आम्ही विकासाच्या नावाखाली आमचे घरदार सोडले आणि हे विमानतळ उभे राहिले याचा अभिमान आहे; मात्र या विमानतळाला आमच्या हक्काची ओळख म्हणून ‘दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव दिले जावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. विमानतळ परिसरात भव्य रचना, अत्याधुनिक सुविधा आणि निसर्गपूरक रचना पाहून सर्वांच्या तोंडून कौतुकाचे शब्द उमटले; परंतु दि. बा. पाटलांच्या नावाची घोषणा न झाल्याने भूमिपुत्र निराश झाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता सुरू झाले आहे; पण आम्हा प्रकल्पग्रस्तांच्या मनातील आशा आणि अपेक्षा अद्याप जिवंत आहेत. या विमानतळाच्या नावात त्यागाचा आणि दि. बा. पाटील यांच्या कार्याचा सन्मान होईल का, हे येणारा काळच सांगेल.
- रवि पाटील, स्थानिक नेते, वहाळ

प्रकल्पग्रस्तांनी त्यांची गावे, राहती घरे, शेती, आयुष्य दिले. त्यामुळे विमानतळावर आमच्या त्यागाची ओळ राहावी, एवढीच इच्छा आहे. दि. बा. पाटील यांच्या नावाशिवाय या प्रकल्पाला पूर्णत्व नाही.
- डॉ. प्रकाश टावरे, भिवंडी

हे विमानतळ खरंच जागतिक दर्जाचे वाटते. टर्मिनलचे आर्किटेक्चर, डिजिटल सुविधा आणि प्रवाशांसाठी असलेली व्यवस्था अतिशय प्रभावी आहे. नवी मुंबईसारख्या शहराला अशा अत्याधुनिक विमानतळाची गरज होती, ती आज पूर्ण झाली.
- राजेश देशमुख, व्यावसायिक प्रवासी, पुणे

वर्षानुवर्षे आम्ही या दिवसाची वाट पाहात होतो. आता प्रवासासाठी मुंबईच्या अंधेरीपर्यंत जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच विमानतळ असल्याचा अभिमान वाटतो.
- मिलिंद पाटील, खारघर, स्थानिक नागरिक

विमानतळामुळे रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील. वाहतुकीसाठी मेट्रो, बस आणि रस्त्यांची सोय उत्तम आहे. नवी मुंबई खरंच ‘फ्युचर सिटी’ बनले आहे.
- ॲड. निशा ठाकूर, रहिवासी, रोडपाली

बॉक्स
वाहतूक कोंडी
कार्यक्रमानंतर बाहेर पडताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. व्हीआयपी वाहतुकीस प्राधान्य दिल्याने सर्वसामान्य नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. दहा मिनिटांच्या अंतरासाठी नागरिकांना अर्धा ते पाऊण तास वेळ लागत होता. पनवेल, उरण आदी मार्गांवरून अटल सेतूमार्गे आलेल्या नागरिकांना परतताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरच्या मिश्री बाजारात मशिदीजवळ भीषण धमाका; दोन स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात सहा जण गंभीर जखमी

Dilip Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीत राज्यातील उमेदवारांसोबत दुजाभाव; भरती प्रक्रियेतील शैक्षणिक अर्हतेसाठी दिले कमी गुण

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT