मुंबई

एकाच विभागात वर्षानुवर्षे कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करा

CD

एकाच विभागात वर्षानुवर्षे कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करा
सजग नागरिक मंचाची निवडणूक आयोगाकडे मागणी
नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) ः आगामी महापालिकेच्या निवडणुका पारदर्शक, निष्पक्ष आणि लोकशाही मूल्यांना अनुरूप होण्यासाठी नवी मुंबई महापालिका (एनएमएमसी), कोकण विभागीय आयुक्त कार्यालय तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये अनेक वर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली केली जावी, अशी सजग नागरिक मंचाने राज्य निवडणूक आयोगाकडे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.
सजग नागरिक मंचाच्या वतीने तयार केलेले निवेदन राज्याचे मुख्य सचिव तसेच भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना पाठवण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यांतील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये काही अधिकारी दीर्घकाळ अर्थात १० वर्षांहून अधिक एकाच पदावर कार्यरत आहेत. काही अधिकारी राजकीय वरदहस्ताचा लाभ घेत सतत सिडको, एनएमएमसी किंवा विभागीय आयुक्त कार्यालयात बदल्या करून घेत आहेत. या अधिकाऱ्यांना ‘ठाणे जिह्याचे सरंजामशहा’ म्हणून नामकरण करत मंचाने यावर तीव्र टीका केली आहे.
अशा प्रकारे दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत राहिलेल्या अधिकाऱ्यांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे सेवा नियम व निवडणूक आयोगाच्या परिपत्रकांनुसार, एकाच पदावर तीन वर्षे किंवा एका जिह्यात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेले अधिकारी तत्काळ इतरत्र बदलीस पात्र आहेत. या नियमांचे पालन करून बदली करण्यात यावी, अशी ठोस मागणी मंचाने केली आहे.
.................
सजग नागरिक मंचाच्या प्रमुख मागण्या :
सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, कोकण विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयातील कालमर्यादा पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली, मुंबई, ठाणे व पनवेल महापालिका क्षेत्रात एकसमान बदल्यांचे नियम अंमलात आणणे. राजकीय संलग्नता असलेल्या किंवा दीर्घकाळ एकाच विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना आचारसंहिता काळात जबाबदारीच्या पदावर ठेवू नये. निवडणुकीदरम्यान बाहेरील जिल्ह्यातील निष्पक्ष अधिकारी निरीक्षक म्हणून नेमावेत. भारतीय संविधानाच्या कलम २४३ झेड ए नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संपूर्ण नियंत्रण राज्य निवडणूक आयोगाकडे असते. त्यामुळे आयोगाने राज्य सरकारमार्फत त्वरित बदल्यांची व्यवस्था करण्यासाठी निर्देश द्यावेत, असे सजग नागरिक मंचाचे सदस्य प्रमोद महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताचा पहिला पराभव, अव्वल क्रमांकाची संधी हुकली! वोल्वार्ड्ट - डी क्लार्कच्या आक्रमणाने द. आफ्रिकेचा विजय

Maharashtra Ranji Squad: पृथ्वी शॉची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड; कर्णधारपदाची ऋतुराज नाही, तर 'या' खेळाडूकडे जबाबदारी

PM Modi Congratulates Trump : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन अन् ट्रेड डीलवरही झाली चर्चा

Mumbai Metro: पहिल्याच दिवशी ‘मेट्रो ३’मधून लाखो प्रवाशांचा प्रवास, पण समस्यांचा पाढा वाचला, वाचा सविस्तर...

INDW vs SAW: पोरीनं काय भारी कॅच घेतलाय! भारताच्या क्रांतीने पकडला वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल; पाहा Video

SCROLL FOR NEXT