मुंबई

बंदी मोडून अवजड वाहने रस्त्यावर

CD

भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : ठाणे-घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी या मार्गावर अवजड वाहनांना शनिवार (ता. ११)पासून प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र त्यानंतरही या मार्गावर अवजड वाहने धावताना दिसत आहेत. रस्त्याचे काम सुरू असल्याने आधीच या मार्गावर कोंडी होत आहे. त्यात बंदी झुगारून अवजड वाहनेदेखील या मार्गावर आल्याने कोंडीत आणखी भर पडत आहे.

गायमुख घाटात रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर गायमुख घाटात डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी पालघर, वसई, मुंबई, काशीमिरा भागातून ठाण्याकडे जात असलेल्या सर्व अवजड वाहनांना ठाणे-घोडबंदर रस्त्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खानिवडे नाका, चिंचोटी नाका, त्याचप्रमाणे मिरा-भाईंदर हद्दीत फाउंटन हॉटेल नाका या ठिकाणी अवजड वाहने अडवण्यात येत आहेत. शनिवारी (ता. ११) ते मंगळवार (ता. १४) रात्री १२ पर्यंत ही बंदी लागू आहे, मात्र त्यानंतरही रविवारी (ता. १२) सकाळपासून ठाणे-घोडबंदर रस्त्यावर अवजड वाहने दिसून आली आहेत.

रस्त्याच्या कामासाठी गायमुख घाटात रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी पूर्ण बंद असून, एकाच बाजूकडून वाहने सोडली जात आहेत. ठाण्याहून येणारी व ठाण्याकडे जाणारी वाहने प्रत्येकी २० मिनिटानंतर सोडण्यात येत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहने किमान अर्धा तास खोळंबत आहेत. त्यातच आता अवजड वाहनांचीदेखील घुसखोरी होऊ लागल्याने कोंडीत भर पडू लागली आहे.

दोन दिवस चालकांना त्रास होणार
शनिवारी रात्री गायमुख घाटाजवळ एक कंटेनर उलटल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजू बंद पडल्या. त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला, मात्र रविवारी सकाळी १० वाजता कंटनेर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. आणखी दोन दिवस वाहनचालकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त विरकर यांनी दिली.

अवजड वाहनांना प्रवेशबंदी असली तरी त्यांना एकदम बंद घातली तर आणखी मोठी समस्या उभी राहू शकते. त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येत आहे. थोड्या थोड्या अंतराने अवजड वाहनांनाही प्रवेश दिला जातो, मात्र सायंकाळी पाच वाजल्यानंतर खानिवडे नाका येथे अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात येणार आहे. यासंदर्भात वाहतूक संघटना, पालघर पोलिस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.
- अशोक विरकर, उपायुक्त,
मिरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडवर; आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

Barshi fraud:'रामगिरी शुगर्स कारखान्याची जमीन गहाण'; २ कोटी १० लाखाची फसवणूक, बार्शी पोलिसांत दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT