मुंबई

सरकारचा डाव हाणून पाडा!

CD

सरकारचा डाव हाणून पाडा!
माहिती अधिकार कायद्याबाबत काँग्रेसचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : लोकशाही शासन व्यवस्थेत जनतेला मूलभूत हक्क व अधिकार दिलेले आहेत. त्याचाच विचार करून डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेला माहितीचा अधिकार कायदा दिला. या कायद्याने सरकारवर अंकुश ठेवण्यास मदत झाली, भ्रष्टाचार उघड झाले; परंतु २०१४पासून केंद्रात आलेल्या भाजपच्या मोदी सरकार या कायद्यात बदल करून तो कमकुवत करीत आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडा, असे आवाहन आज महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
काँग्रेस सरकारने आणलेल्या माहिती अधिकार कायद्याला आज २० वर्षे झाली. त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सकपाळ यांनी टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसने जनतेला दिलेल्या या महत्त्वाच्या कायदेशीर अधिकाराची धार भाजप सरकार बोथट करीत आहे. विचारलेली माहिती न देणे, माहिती अधिकार आयुक्तांची पदे रिक्त ठेवणे, वैयक्तिक माहिती आहे अशी सबब देऊन माहिती न देणे असे प्रकार सुरू आहेत. आता तर आरटीआयच्या कक्षातून रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगालाही वगळले आहे. मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज न देणे, मतचोरीचा भांडोफोड होऊ नये वा नोटबंदीचा फज्जा उडाला अशा प्रकारची माहिती जनतेला मिळू नये यासाठी यात बदल केले आहेत. एकूणच सरकारी पातळीवर सुरू असलेली अनागोंदी, भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून माहिती अधिकार कायदा कमजोर केला आहे; पण काँग्रेस पक्ष याविरोधात आवाज उठवून हा कायदा अधिक मजबूत असावा यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सपकाळ म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाजासमाजात भांडणे लावत आहेत. इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा ते अत्यंत थंड डोक्याने वापर करून समाजात भांडणे लावत आहेत, असे सपकाळ म्हणाले.
...
भारताचा तालिबान करायचा आहे!
तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्याच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना परवानगी न देण्याचा तालिबानी फतवा भारतात काढणे हे अत्यंत आक्षेपार्ह असून, काँग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दांत निषेध करीत आहे. भाजपला भारताचा तालिबान करायचा आहे, असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
...
राज आणि उद्धव ठाकरे भेट
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, की आम्ही ‘भारत जोडोवाले’ आहोत. दोन भावांनी एकत्र यावे किंवा किती वेळा भेटावे यावर काँग्रेसचा काही आक्षेप व हरकत नाही. इंडिया आघाडीत कोणाला सहभागी करायचे याचा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्ष घेतील, असे सपकाळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT