मोखाडा, ता. १४ (बातमीदार) : यंदा मुसळधार पावसाने संपूर्ण राज्याला झोडपले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. सरकारच्या आदेशानुसार नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्यात आले आहेत. मोखाड्यातील ५९ महसुली गावांपैकी ४९ गावांतील सुमारे १८६ हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. त्यासाठी सरकारकडे भरपाईचा प्रस्ताव सादर केला आहे.
मोखाड्यात मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीची प्रथमदर्शनी ५४ गावांतील शेतीची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी १५४ हेक्टर बाधित क्षेत्रातील एक हजार २९ शेतकऱ्यांना फटका बसल्याचे निदर्शनास आले होते, मात्र कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवकांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत ४९ गावांतील १८६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एक हजार ४४१ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यांना भरपाई मिळावी, म्हणून प्रशासनाने १५ लाख ८२ हजारांच्या भरपाईचा प्रस्ताव सादर केला आहे. आता दिवाळीपूर्वी भरपाई मिळण्याची आस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.