मुंबई

बदलापूर स्थानकात प्रवाशांचा हल्लाबोल

CD

बदलापूर स्थानकात प्रवाशांचा हल्लाबोल
सलग तीन दिवस लोकल अर्धा तास उशिराने; पहाटे प्रवाशांचा ‘राडा’

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा,
बदलापूर, ता. १४ : लोकल उशिराने धावण्याची समस्या बदलापूरकरांच्या पाचवीलाच पुजलेली असून, मंगळवारी (ता. १४)देखील लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरच्या कार्यालयाला घेराव घालून रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. तांत्रिक अडचणींमुळे लोकल उशिराने धावत असल्याची उत्तरे देऊन रेल्वे प्रशासनाने वेळ मारून नेली, मात्र उद्याही हीच परिस्थिती कायम राहिल्यास रेल्वे रुळांवर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रवाशांनी दिला आहे.

मंगळवारी पहाटे कर्जतहून मुंबईच्या दिशेला जाणारी आणि बदलापूर स्थानकात ४ वाजून ७ मिनिटांनी येणारी लोकल जवळपास अर्धा तास उलटून गेला तरी स्थानकात पोहोचली नव्हती. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी बदलापूर स्टेशन मास्तर कार्यालयाला घेराव घातला. लोकल उशिरा येण्याचे कारण विचारले असता, प्रशासनाने ‘तांत्रिक अडचण’ असल्याचे उत्तर दिले. या वेळी संतप्त प्रवाशांनी एक्स्प्रेसला बदलापूर स्थानकात थांबा देण्याची मागणी केली, मात्र रेल्वे प्रशासनाने लोकल आल्यानंतर कल्याण स्थानकात उतरून पुढे एक्स्प्रेसने जाण्याचा सल्ला दिला. पहाटे ४ वाजून ७ मिनिटांनंतर सकाळी १० वाजेपर्यंत बदलापूर स्थानकातील सर्वच लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या.

सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी सुटणाऱ्या लोकलला मोठी गर्दी असल्याने या वेळेतही रेल्वे प्रवाशांनी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाबाहेर ‘हल्लाबोल’ केला. वर्षातील बाराही महिने हा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांनी केली आहे.
‘रोज मरे, त्याला कोण रडे’ ही म्हण मध्य रेल्वेच्या सुविधेवर तंतोतंत लागू पडते, अशी संतप्त प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांमधून उमटत आहे. या रविवारी मेगाब्लॉक संपल्यानंतरही बदलापूर ते कर्जत लोकल बंद होत्या, ज्यामुळे रात्री ११ च्या सुमारास बदलापूर स्थानकात प्रवाशांनी गदारोळ केला होता. सोमवारी (ता. १३) आठवड्याच्या पहिल्या दिवशीही लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या त्रासाची परिसीमा ओलांडल्यामुळे प्रवाशांनी एकत्र येत स्टेशन मास्तरांना दम दिला.

रेल्वे फेऱ्या कमी, तरीही उशीर :
बदलापूरमध्ये राहणारा चाकरमानी मोठ्या संख्येने रोज मुंबईला नोकरीसाठी प्रवास करतो. त्यामुळे प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे. सुमारे दीड लाख प्रवासी रोज बदलापूर स्थानकातून प्रवास करतात. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या काळात कल्याण ते कर्जतदरम्यान ३२ नवीन लोकल फेऱ्या प्रस्तावित होत्या, पण त्यानंतर १५-२० वर्षांत फक्त तीनच फेऱ्या वाढल्या आहेत. बदलापूरकरांना आवश्यक असलेल्या लोकल फेऱ्यांच्या तुलनेत निम्म्या फेऱ्याही उपलब्ध नाहीत आणि ज्या आहेत, त्याही अर्धा ते पाऊण तास उशिराने धावतात. यामुळे बदलापूर स्थानकात अनेकदा गोंधळ आणि आंदोलने झाली आहेत.

‘‘मागील तीन दिवसांपासून लोकल उशिराने धावत असल्याच्या घटना घडत आहेत. हा प्रकार वर्षभर सुरू असतो, पण मागील तीन दिवसांत मेगाब्लॉकच्या नावाखाली रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेठीस धरले आहे. उद्यादेखील हीच परिस्थिती असेल, तर बदलापूर स्थानकातआंदोलन छेडले जाईल आणि आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील.’’
राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT