मुंबई

काश्मिरी सफरचंदाची मागणी वाढली

CD

काश्मिरी सफरचंदाची मागणी वाढली
वातावरणीय बदलामुळे सीताफळसह पेरूला नापसंती
जुईनगर, ता. १९ (बातमीदार) ः हंगामी फळांच्या बाजारात काश्मिरी सफरचंदाची मागणी वाढली आहे, तर सीताफळ आणि पेरूसारख्या फळांची मागणी घटली आहे. यासोबतच सफरचंदाचे दरही लक्षणीयरीत्या वाढले आहेत. येत्या पंधरा दिवसांत काश्मिरी सफरचंदाचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढू शकतात, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
पूर्वी घाऊक बाजारात १५ रुपये किलोची पेटी ७०० ते ८०० रुपयांना उपलब्ध होत होती, तर सध्या तीच पेटी एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत गेली आहे. परिणामी, किरकोळ बाजारात सफरचंदाचे दर १५० ते २०० रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. या दरवाढीमुळे सफरचंद व्यापाऱ्यांचा आनंद वाढला आहे. दुसरीकडे, पेरू आणि सीताफळांसाठी मागणी घटल्याने त्यांच्या दरात घसरण झाली आहे. सध्या या फळांचा हंगाम सुरू असला तरी वातावरणीय परिस्थितीमुळे फळांमध्ये अळी उत्पन्न झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, ग्राहकांनी या फळांची खरेदी कमी केली असून, घाऊक बाजारात माल पडून राहिला आहे. सध्या सीताफळ आणि पेरू प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांमध्ये विकले जात आहेत. व्यापारी याबाबत सांगतात, की शिमला सफरचंद हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि नोव्हेंबरपर्यंत काश्मिरी सफरचंदाची मागणी सतत राहणार आहे. विशेषतः काश्मिरी सफरचंद खाण्यासाठी चवदार असल्यामुळे ग्राहक त्याची मागणी सातत्याने करीत आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या झालेल्या दरवाढीने सफरचंद विक्रेते समाधानी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT