मुंबई

शिवरायांच्या आरमार दिनाला उजाळा

CD

शिवरायांच्या आरमारदिनाला उजाळा
इतिहास संकलन समितीने उलगडले आरमार स्थापनेचे पान

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : ज्यांच्या ताब्यात समुद्र, त्यांच्या ताब्यात सत्ता; ज्यांच्या ताब्यात सत्ता, त्यांच्या ताब्यात व्यापार आणि ज्यांच्या ताब्यात व्यापार, त्यांच्या राज्यात समृद्धी हे सूत्र ध्यानात घेऊन, स्वराज्य संवर्धनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वसुबारसेच्या दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबर १६५७ रोजी, कल्याण-भिवंडीच्या सीमेवर असलेल्या किल्ले दुर्गाडी येथे स्वराज्यात आरमार (नौदल) दाखल केले आणि नंतर स्वराज्याचे आरमार स्थापन केले. या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनेची गौरवपूर्ण दखल घेण्यासाठी इतिहास संकलन समितीने यंदाही ‘आरमारदिनाला’ उजाळा देण्याचा प्रयत्न केला.

इतिहास संकलन समितीतर्फे दरवर्षी वसुबारसेच्या दिवशी ‘आरमारदिन’ साजरा केला जातो. यावर्षीचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी टिळकनगर विद्यामंदिरात झाला. या कार्यक्रमाला इतिहास संकलन समितीच्या अध्यक्षा मेघना कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून विख्यात आयुर्वेदाचार्य वैद्य महेश ठाकूर, तर प्रमुख वक्ता म्हणून निवृत्त कमांडर तथा इतिहास संकलन समितीच्या गोवा प्रांताचे प्रांत समिती सदस्य प्रसाद पाध्ये, तसेच कल्याण जिल्हा संघचालक नितीन शिंत्रे उपस्थित होते.

वेद मूर्ती महेश खरे यांनी गणेश घाटावर मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करवून घेतले. सभेच्या ठिकाणी देश कालोच्चारण, तसेच संकल्प सांगण्यात आला. मेघना कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि इतिहास संकलन समिती कल्याण जिल्ह्याच्या कार्यवाह सुखदा रावदेव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे वैद्य महेश ठाकूर यांनी भारतीय नौकानयनाचा वेद कालापासूनचा इतिहास संदर्भासहित थोडक्यात पण अत्यंत रोचक पद्धतीने उलगडला.

इतिहास संकलन समितीचे प्रांत सचिव चंद्रकांत जोशी यांनी निवृत्त कॅप्टन सुभाष वर्मा, मृत्युंजय आन-मान ठाकूर बंधूंचे वंशज ॲडव्होकेट इंद्रजीत ठाकूर, रोटरी क्लबचे उपाध्यक्ष आगटे, अभ्युदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा सन्मान केला. इतिहास संकलन समितीच्या कल्याण जिल्ह्याच्या कोषाध्यक्ष सायली फणसे यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर कार्यवाह सुखदा रावदेव यांनी वंदे मातरम् सादर केले. इतिहास संकलन समितीच्या सदस्या डॉ. प्राची दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वासुदेवराव कोल्हटकर, पंकज येवले, विनोद बेंद्रे, विवेक भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

भारतीय नौदलाची सुंदर सफर
प्रमुख वक्ते म्हणून भारतीय नौसेनेचे निवृत्त कमांडर प्रसाद पाध्ये यांनी ‘पीपीटी’च्या सहाय्याने गेल्या शंभर वर्षांतील भारताचा नौदल विकास, तिन्ही समुद्रांतील आपली वाढत जाणारी शक्ती, तसेच सर्वच राष्ट्रीय संकटांमध्ये भारतीय नौदलाचा सहभाग यांची सुंदर सफर श्रोत्यांना घडवली. मेघना कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये कार्यक्रम अतिशय नेटका झाल्याबद्दल गौरवोद्गार काढले, तसेच इतिहास संकलन समितीमध्ये सदस्य म्हणून जोडले जाण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RJD Candidate Arrested : उमेदवारी अर्ज दाखल करताच 'राजद'च्या उमेदवारास झारखंड पोलिसांनी केली अटक!

Deglur Accident : बस व ट्रॅव्हल्स समोरासमोर अपघात २८ जण गंभीर जखमी, लेंडी पुला जवळील घटना; २ तास वाहतूक खोळंबंली

'२०२७ वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर आगरकर - गंभीरला पदावरून हटवा!', Navjot Singh Sidhu खरंच असं म्हणाले? स्वत:च केला खुलासा

Diwali Celebration : ऑपरेशन पहाट; सोलापूर पोलिसांनी पारधी कुटुंबांसोबत साजरी केली दीपावली, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Actor Asrani Passes Away : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT