मुंबई

ठाण्यात उन्नत, भुयारी मार्गांचे जाळे

CD

ठाण्यात उन्नत, भुयारी मार्गांचे जाळे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : ठाणे ते बाेरिवली १५ मिनिटांत

सकाळ वृत्तसेवा
ठाणे. ता. २० : मुंबईतून पूर्व मुक्त मार्गावरून आनंदनगर-साकेत-गायमुख-फाउंटन हॉटेल असा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. तसेच टिकुजिनीवाडी ते बोरिवली असा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर भविष्यात केवळ १० ते १५ मिनिटांत पार करता येणार आहे. वाहतूक कोंडीमुळे सध्या यासाठी दोन ते अडीच तास लागतात. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी दूर होऊन ठाण्याच्या विकासाला चालना मिळणार आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राजमाता जिजाऊ उद्यान ‘ऑक्सिजन पार्क’चे उद्‍घाटन सोमवारी (ता. २०) मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. त्यानंतर ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील जय भवानीनगर येथे नव्याने नूतनीकरण केलेल्या स्वर्गीय आनंद दिघे उद्यानाचे उद्‍घाटनही आज करण्यात आले.
ठाण्याचा झपाट्याने विकास होत आहे. चांगले अधिकारी मिळाले, तर जिल्ह्याचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. मोठ्या शहरांत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आवश्यक आहे. मी आयुक्तांना एक लाख झाडे लावण्याची सूचना केली होती. त्यांनी तब्बल एक लाख २५ हजार झाडे लावली. यावर्षी दोन लाख झाडे लावण्याचे सुचविले असता त्यांनी दोन लाख नऊ हजार झाडे लावली आहेत. मुंब्राच्या टेकडीवरील झाडांची वाढ आणि त्यांचा ‘वाढदिवस’ साजरा करणाऱ्या नागरिकांचा उल्लेख करताना त्यांनी पर्यावरणप्रेमी समाजाचे कौतुक केले. पर्यावरण रक्षणासाठी गायमुख, लोकमान्यनगरसह अन्य ठिकाणी ‘अर्बन फॉरेस्ट’ची निर्मिती करण्यात आली आहे. वन विभागाच्या जमिनीवर पन्नास हजार बांबू लावण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. प्रत्येक विद्यार्थ्याने दोन झाडे लावून ती जगवावीत, अशी सूचना त्यांनी केली.
----
‘काहींना बांबू लावू’
उद्यानात औषधी वनस्पती, भरपूर ऑक्सिजन आणि गारवा आहे. फिरण्यासाठी ५०० मीटरचा ट्रॅक तयार केला आहे. येथे फिरल्याने बरेच आजार दूर होतील. पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली असून, काही लोकांवर ‘बांबू लावण्याचे’ काम योग्य रीतीने होईल, अशी काेपरखळी शिंदे यांनी मारली.
----
सध्याचे ठाणे हे बदलते ठाणे आहे. रस्ते रुंदावत आहेत. मेट्रोचे जाळे वाढत आहे. डिसेंबरमध्ये मेट्रोचा पहिला टप्पा लवकरच सुरू होईल, तर पुढील टप्प्यात ती मिरा-भाईंदर व वडाळ्यापर्यंत जाईल. ठाण्यात रिंग मेट्रोही होणार आहे. विकसित, बदलते आणि हरित ठाणे घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT